Most selected posts are waiting for you. Check this out
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! आगामी दोन दिवस महाराष्ट्रातील ‘या’ भागात बरसणार अवकाळी पाऊस, चक्रीवादळ ठरणार धोक्याचे
जनजागृतीच्या माध्यमातून महिला व बालकांवरील अत्याचारांवर नियंत्रण शक्य : जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे
![]() |
मुर्तीजापुर : महिला व बालक यांच्यावर होणारे अत्याचार जनजागृतीच्या माध्यमातून नियंत्रणात आणणे शक्य आहे. महिला व बालक सुरक्षा व सुरक्षात्मक उपाययोजना करीता सर्वांनी सजग राहावे.अशी घटना कुठे दिसून येत असल्यास त्याबाबत पोलिसांना कर्तव्य समजून माहिती दिल्यास अत्याचारा ग्रस्तांना मदतीचा हात देता येईल.वाईट हेतूने केलेल्या
स्पर्शबाबत(बॅड टच) प्रतिकार करण्याची क्षमता ठेवावी. अठरा वर्षाखालील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी दुचाकी वाहने चालवणे तसेच ट्रिपल सीट बसविणे कायद्याने गुन्हा आहे.तेव्हा पालकांनी देखील लहान वयापासूनच आपल्या पाल्यांना कायदा मोडण्याची मुभा देऊ नये.पालकांनी याची दखल घ्यावी.असे आढळल्यास गुन्हा दाखल करण्याचे प्रावधान देखील कायद्यात आहे.असे प्रतिपादन अकोला जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी केले.त्यांच्या संकल्पनेतून आयोजित महिला व बालक सुरक्षा व सुरक्षात्मक उपाययोजना याबाबत आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते.या कार्यशाळेचे आयोजन मुर्तीजापुर शहर पोलीस स्टेशनच्या वतीने महालक्ष्मी मंगल कार्यालय येथे करण्यात आले होते.
याप्रसंगी व्यासपीठावर दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश श्री.कुरेशी साहेब,उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार,नगरपालिकेच्या मुख्याधिकारी सुप्रिया टवलारे तसेच अकोला दामिनी पथकाच्या पोलीस निरीक्षक उज्वला देवकर, शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार घुगे,ग्रामीण पोलीस स्टेशनचे थानेदार सुरेंद्र राऊत,माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरवसे यांची उपस्थिती होती.
यावेळी दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश श्री.कुरेशी साहेब यांनी देखील उपस्थित विद्यार्थ्यांना कायदेविषयक मार्गदर्शन करुन महत्त्वपूर्ण माहिती दिली.याप्रसंगी विविध शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच शहरातील मान्यवर, महिलावर्ग यांची देखील उपस्थिती होती.याप्रकारे तालुका आणि ग्रामीण भागात विविध स्तरावर कार्यशाळा आयोजित करून जनजागृती करण्यात येणार असल्याचे संदीप घुगे यांनी पुढे बोलताना सांगितले.यावेळी शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार घुगे यांनी देखील गुन्ह्यांवर अंकुश ठेवण्याकरिता विविध उपाय योजनांबाबतची माहिती दिली.सूत्रसंचालन गोपाल मुकुंदे यांनी केले.तर आभार पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी यांनी केले.
आईने किडनी दिल्याने मुलाला मिळाले जीवदान
अमरावती सुपर स्पेशालिस्ट रुग्णालयात यशस्वी प्रत्यारोपण
मुर्तीजापुर : दोन्ही किडन्या निकामी झालेल्या गॅस टँकर चालक मुलास आईने किडनी देऊन आपल्या पोटच्या गोळ्याला मृत्यूच्या दाढेतून परत आणून मातृत्वासोबत दातृत्वाचा परिचय दिला.आई आपल्या पाल्याचे प्राण वाचवण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत धडपड करते हे या घटनेवरून दिसून आले आहे .
तालुक्यातील उमरी अरब येथे राहणारे मुस्ताक बिन मुजफ्फर चाऊस (वय-३९) हे गॅस टँकर चालवुन आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. मागील एक वर्षापासून किडनीच्या आजाराने ते त्रस्त झाले होते त्यांच्या आजारावर किडनी प्रत्यारोपण हाच एकमेव पर्याय होता.
त्या अनुषंगाने अमरावती येथील सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये त्यांच्या आई शकीला बी मुजफ्फर चाऊस (वय-५८) यांनी एक किडनी आपल्या मुलास घेऊन जीवदान दिले.प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया अमरावती येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ.अमोल नरोटे, विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश मेंढे यांच्या मार्गदर्शनास नेफ्रॉलॉजिस्ट डॉ.प्रणित काकडे,डॉ. नयन काकडे ,डॉ.हितेश गुल्हाने ,युरोसर्जन डॉ.राहुल पाटोडे,डॉ. विक्रम देशमुख, डॉ. विशाल बेलवीर ,डॉ. प्रतीक चिरडे ,बधिरीकरण तज्ञ डॉ. रोहित हातगावकर, डॉ.बालकृष्ण बागवले ,डॉ.दिपाली देशमुख ,डॉ. जफर अली,डॉ.नंदिनी देशपांडे,डॉ.अंजू दामोदर,डॉ.सुनीता हिवसे आर.एम.ओ. , किडणी समन्वयक डॉ.शीतल बोंडे यांच्यासह संपूर्ण पथकाने महत्त्वपूर्ण जबाबदारीची भूमिका बजावली.
सामाजिक सेवा अधीक्षक सोनाली चौधरी यांनी संपूर्ण कागदपत्राचे पूर्तता करून महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना अंतर्गत किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया निशुल्क करण्यात आली. मुस्ताक बिन मुजफ्फर चाऊस यांची १ डिसेंबर रोजी झालेली किडनी प्रत्यारोपणाची ३३ वी शस्त्रक्रिया सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अमरावती येथील शस्त्रक्रिया होती. सदर रुग्णालयात किडनी प्रत्यारोपणाची ३३ शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्यामुळे शासकीय रुग्णालयांमध्ये देखील मोठ्या शस्त्रक्रिया यशस्वी होत असल्याने सर्वसामान्य गोरगरिबांना दिलासा मिळत आहे.
बांधकाम कामगारांना नोंदणी शुल्क केवळ एक रुपया
.jpeg)
अकोला : बांधकाम कामगारांना अर्ज नोंदणीसाठी वार्षिक केवळ एक रूपया शुल्क आकारण्यात येते व रीतसर पावतीही देण्यात येते. त्यामुळे कामगार बांधवांनी कुठल्याही भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त डॉ. रा.दे.गुल्हाने यांनी केले आहे.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या असंघटित कामगारांची नोंदणी, नूतनीकरण व विविध योजना लाभ वाटपाचे काम करताना एक रुपया वार्षिक शुल्काव्यतिरिक्त कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जात नाही. नोंदणी, नूतनीकरण व विविध योजनेबाबत अडचण असल्यास कार्यालयास प्रत्यक्ष भेट द्यावी किंवा कार्यालयाचे मोबाईल क्र. 7576625585 वर संपर्क करावा.
या कामकाजासाठी कोणत्याही खासगी प्रतिनिधी, अथवा एजंट, दलाल यांची नेमणूक करण्यात आलेली नाही. बांधकाम कामगारांना त्यांच्या योजनेनुसार कागदपत्राची तपासणी करण्याकरिता कार्यालयात खिडकीवर दिलेल्या तारखेस व्यक्तिशः उपस्थित राहून मूळ कागदपत्राची पडताळणी करणे आवश्यक आहे. बांधकाम कामगारांनी इतर कोणत्याही खोट्या बोलण्याला बळी न पडता नोंदणी व नुतनीकरण करून घ्यावे. तसेच अतिरिक्त रक्कम मागणी करणा-या व्यक्तीविरूध्द नजिकच्या पोलीस ठाण्यामध्ये परस्पर तक्रार नोंदवावी, असे आवाहन मा. डॉ. गुल्हाने यांनी केले आहे.
कार्यालयाचे स्थानांतर..
मंडळाचे कार्यालय सहाय्यक कामगार आयुक्त, अकोला कार्यालयाचे जागेत होते. आता त्याचे स्थानांतर झाले असून कार्यालयाचा नवीन पत्ता मराठा सेवा संघ कार्यालय, छत्रपती संभाजी मार्ग, मुर्तिजापूर रोड, आर.टी.ओ. च्या जुन्या कार्यालयाजवळ, अकोला असा आहे.
महिला अत्याचाराविरोधात पेटून उठण्याची गरज - प्रा. अंजली आंबेडकर
अकोला : समाजातील विकृती वाढत असून कमी वयाच्या मुलींवर अत्याचार होतात. स्त्रियांवरील हिंसा, कौटुंबिक अत्याचार, हुंडाबळी वाढले. समाजातील हे चित्र अत्यंत चिंताजनक आहे.
याविरोधात समाजातील जागरुक झालेल्या चळवळीतील महिला तसेच सर्व घटकांनी पेटून उठण्याची गरज आहे. एकत्र येऊन लढा दिला तरच या महिलांवरील अत्याचाराला पायबंद लागण्यास मदत होईल, असे मत वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या तथा विचारवंत प्रा.अंजली आंबेडकर यांनी व्यक्त केले.
सामर्थ्य फाउंडेशनच्यावतीने आयोजित सामर्थ्य व्याख्यानमालेचे स्व. गौकर्णाबाई पांडुरंग भिरड यांच्या स्मृती प्रीत्यर्थ द्वितीय पुष्प ‘स्त्रियांची सामाजिक वाटचाल’ या विषयावर गुंफतांना त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी श्री.रा.ल.तो. विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय नानोटी, तर व्यासपिठावर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बालमुकुंद भिरड, विजया भिरड, सामर्थ्य फाउंडेशनचे अध्यक्ष प्रबोध देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मान्यवरांचे सत्कार संस्कृती संवर्धन समितीचे अध्यक्ष डॉ. आर.बी. हेडा, डॉ. अशोक सोनोने, विजय शिंदे, ॲड. संतोष भाेरे, प्रशांत चाळीसगावकर, किरण चौक, मिलिंद देव, अनिता पळसपगार, अनुश्री उखळकर, सविता राठोड आदींनी केले.
स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील महिलांच्या अधिकाराच्या वाटवाचाल प्रा.अंजली आंबेडकर यांनी अभ्यासपूर्ण उलगडली. ‘चूल आणि मूल’ पुरते मर्यादित असलेल्या देशातील महिला स्वातंत्र्य चळवळीच्या निमित्ताने प्रथम घराबाहेर पडल्या.
नोकरी, राजकारणात आल्या. हा क्रांतिकारी आमूलाग्र बदल भारताच्या संविधानाने महिलांना दिला. त्याचे श्रेय घटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व समितीला आहे. जाती व्यवस्था मोडायची असेल तर आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, हा विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मांडला.
आजच्या काळात महिलांना संपत्तीत मिळालेला समानता, मनाने नको ते लग्न मोडण्याचा आणि एका विशिष्ट प्रौढ वयात लग्न करण्याचा अधिकार त्याकाळी संविधान निर्मितीनंतर घटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना समितीपुढे हिंदू कोड बिलामध्ये मांडलेला होता. त्यामुळेच ते फेटाळले गेले होते, हे सर्व स्त्रियांनी समजून घेणे गरजेचे आहे, असे प्रा.आंबेडकर म्हणाल्या.
१९७५ नंतर देशात खऱ्या अर्थाने स्त्री मुक्ती चळवळीला गती मिळाली. हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला वर्ष जाहीर झाले होते. त्याचवर्षी इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू केली. सर्व सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी होती. महिलांच्या कार्यक्रमावर महिला पंतप्रधानाने बंदी लावली तर चहूबाजूने टिकेची झोड उठणार, हे लक्षात घेऊन इंदिरा गांधींनी महिला सक्षमीकरणाच्या कार्यक्रमावरीस बंदी उठवली. विरोधी पक्षांनीही महिलांच्या माध्यमातून कार्यक्रम घेऊन त्याचा फायदा घेतला.
त्यामुळे स्त्री मुक्ती चळवळीला नवी दिशा मिळाली, असे देखील त्यांनी सांगितले. प्रास्ताविक प्रबोध देशपांडे यांनी, तर सूत्रसंचालन डॉ. स्वाती दामोदरे यांनी केले. आभार ॲड. धनश्री दामोदरे यांनी मानले.
१८ किलो गांजा जप्त; मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांची कारवाई
मूर्तिजापूर: ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या अनभोरा येथे ग्रामीण पोलिसांनी १ लाख ८० हजार रुपयांचा जप्त करुन आरोपी लक्ष्मण उर्फ सोनू बाबाराव मोहिते यास अटक केली.
मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी सापळा रचून ४ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास अनभोरा येथील.
लक्ष्मण उर्फ सोनू बाबाराव मोहिते (२३) याच्या घरी छापा टाकून त्याच्या कडून विक्रीसाठी ठेवण्यात आलेला १ लाख ८० हजार १२० रुपये किमतीचा १८ किलो १२ ग्रॅम गांजा हस्तगत करण्यात आला या प्रकरणी आरोपी लक्ष्मण उर्फ सोनू बाबाराव मोहिते यास अटक करुन त्याच्या विरूद्ध अपराध क्रमांक ४०१ / २३ कलम २० ब एन डी पी एस अक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा
पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सुरेंद्र राऊत, पोलिस उपनिरीक्षक सुनील नवलाखे, विजय मानकर, गोलंदास लांजेवार, अनिल टोपकर, संजय खंडारे, मनिष मालठाणे, शंकर खेडकर, गणेश ठाकरे घनश्याम सलामे, इरफान अली, महिला शिपाई वर्षा धारपवार यांनी केली.
राजकारणात साध्या, सात्विक विचारसरणीचा मापदंड निर्माण करणारे व्यक्तिमत्व हरपले
मुंबई : राजकारण-समाजकारणातील एक साधे, सात्विक व्यक्तिमत्व हरपले अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माजी आमदार आणि ज्येष्ठ शेकाप नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाचा चेहरा म्हणून दिवंगत देशमुख यांची वाटचाल कदापिही विसरली जाणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजलीही अर्पण केली आहे.
मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, ज्येष्ठ नेते देशमुख यांनी सर्वाधिक काळ आणि सातत्याने सांगोला मतदारसंघाचे प्रतिनिधित्व राज्य विधिमंडळात केले. हे तर त्यांच्या राजकीय कारकिर्दीचे वैशिष्ट्य होतेच, पण त्यापेक्षाही ज्या साध्या आणि उच्च विचारसरणीने त्यांनी त्यांचे जीवन व्यतीत केले ते मला महत्वाचे वाटते असे सांगून मुख्यमंत्री म्हणतात की, आबासाहेबांनी राजकारणामध्ये एक आदर्श निर्माण केला, जो की वर्षानुवर्षे एक मापदंड म्हणून राजकीय विश्वात कायम राहील. सर्वच पक्षांत त्यांच्या विचारसरणीचे चाहते होते. संसदीय कार्यप्रणालीवर त्यांचा नितांत विश्वास होता. त्यामळे विधिमंडळाच्या कामकाजातही त्यांचा सर्वपक्षीयांना मार्गदर्शक म्हणून आधार होता, धाक होता. कष्टकरी- शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवणारा नेता म्हणून त्यांची तळागाळापर्यंत ओळख होती. यातूनच त्यांनी विधिमंडळात अनेक कल्याणकारी योजनांचा पाठपुरावा केला. अशा योजनांना त्यांनी नेहमीच पक्षीय भेदापलिकडे जाऊन पाठबळ दिले. ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
#डॉक्टर हो_आम्ही_सुद्धा.!
- डॉक्टरांची प्रतिकूल बाजू
केवळ 90% पेक्षा जास्त मार्कस् मिळाले म्हणून, किंवा आपले पालक अथवा नातेवाईक म्हणतात म्हणून, किंवा तुम्हाला जास्त पैसे कमवायचे आहेत म्हणून वैद्यकीय क्षेत्र अजिबात निवडू नका. जे खरचं कठीण परिश्रम करू शकतात, मानसिक ताण-तणाव सहन करू शकतात आणि ज्यांना मनापासून रूग्णांना बरे करण्याप्रती उत्कटता आहे आणि जे या क्षेत्रात आल्यानंतर आपल्या आवडी निवडींचा त्याग करण्यास तयार असतील, जे कोणत्याही कठीण परिस्थितीत टिकून राहू शकतील त्यांनी खरचं वैद्यकीय क्षेत्रात यावे.
कारण वैद्यकीय क्षेत्रात आल्यानंतर तुमचे खाजगी असे जिवन जास्त रहातच नाही. तुमचा बहुतांश वेळ हा रूग्णालयात आणि रूग्णांच्या सान्निध्यातच जातो.
नाण्याच्या जशा दोन बाजू असतात, अश्याच दोन बाजू प्रत्येक क्षेत्राच्या देखील असतात असं मी मानते. सगळ्यांसाठी वैद्य हा देवमाणूस समानच असतो, पण वैद्यांना सुध्दा बर्याच वाईट गोष्टींचाही सामना करावा लागतो.
आता हेच पहा ना, भारतामध्येच कितीतरी वैद्यांना मारहाण करण्यात आली आणि अजुनही मारहाण करण्यात येते. आणि या गोष्टी कोणीही वैद्य मानसिकरित्या मुळीच विसरू शकत नाही. सामान्य जणतेने खरंच वैद्यांकडून विश्वास गमावला आहे. निदान आत्तापर्यंत तरी जनतेकडून अशीच वर्तनुक होती. परंतु आता या Covid-19 मुळे काही अंशी ही परिस्थिती हळूहळू बदलत आहे, मी ते ही मान्य करते.
असो..
मी एक प्रश्न स्पष्टपणे विचारते, स्वतःला ही आणि तुम्हाला ही, आजकाल खरचं अशे किती रूग्ण आहे जे वैद्याने सांगितलेले पथ्य इत्यादी गोष्टी अगदी विश्वासाने ऐकतात आणि त्याचे पालन करतात ?
अर्थातच दहा पैकी पाच रूग्ण हे वैद्याने सांगितले खरंच मनापासून ऐकत नाहीच. ५० ते ७० वयाच्या सुमारासचे केवळ जे वरिष्ठ नागरिक रूग्ण असतात खरंतर फक्त तेच वैद्यांच बोलणे अगदी सिरीयसली ऐकतात आणि त्याचे पालन करतात.
एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल, कोणत्याही तरुण रूग्णापेक्षा जे वरिष्ठ नागरिक रूग्ण असतात ते रूग्णच वैद्याचे मनोभावे आभार मानतात. कारण तरुण रूग्ण फक्त वैद्यांना शुल्क देण्यासाठी आणि त्यांच्याकडून सेवा पुरवुन घेणारे मानतात. म्हणजेच मी तुला पैसे देतोय, त्यामुळे तुम्ही तुमचे काम करा.! असा काहीसा आविर्भाव तरूण रुग्ण वर्गाचा असतो.
अशाच आणि इतरही बर्याच काही कारणांमुळे आजच्या तरुण वैद्यकीय पिढीमध्ये ताण, तणाव, उदासीनता, निराशा आणि एकाकीपणाचे प्रमाण वाढले आहे. वैद्य हा त्याचे मित्र, कुटुंब आणि सहकार्यांसह सभोवताली तर असतोच, परंतु तरीसुद्धा प्रत्यक्षात तो एकटाच असतो.
..आणि जर वैद्याच्या कुटुंबात अथवा मित्र परिवार मध्ये जर वैद्यकीय क्षेत्राशी निगडित कोणी नसल्यास, वैद्य सफर करत असलेल्या कठीण परिस्थितींना कोणी योग्य पद्धतीने नाहीच समजून घेऊ शकत. अशावेळेस तुम्ही वैद्यांना सहानुभूती नक्कीच देऊ शकाल, पण तुम्ही आमच्या वैद्यकीय क्षेत्राची वास्तविकता समजण्यास असमर्थच व्हाल.
आम्हाला आधी शिक्षणामुळे तुमच्या सगळ्यांपासून दूर रहावे लागते आणि नंतर काम सुरू झाले की दिवस रात्र रूग्णालय आणि रूग्ण यांच्यासमवेतच दिवस जातात. यामुळे आम्हाला तुम्हा सगळ्यांशी भेटणं तर लांबच पण कॉल अथवा मेसेज वर देखील बोलायला एवढा वेळ मिळत नाही. ईतके आम्ही रूग्णालयामध्ये रूग्णांचे व्यवस्थापन करण्यात व्यस्त होऊन जातो.
खरंच इतर कोणत्याही क्षेत्रापेक्षा वैद्यकीय क्षेत्र हे सर्वात व्यस्त क्षेत्र आहे. कारण या क्षेत्रात दिवस रात्र २४ तास सेवा करत रहावी लागते. अशा परिस्थिती मग बर्याच जणांचा असाच समज असतो की वैद्य किती अहंकारी आणि गर्विष्ठ असतात, का तर आम्ही तुम्हाला भेटंत बोलंत नाही, वेळ देत नाही म्हणून..
बाकीच्या या सर्व गोष्टींमुळे आम्ही आधीच निराश झालेलो असतो आणि अशा वेळेस वैद्यांनाच जर कोणी समजून घेणार नसेल तर अथार्तच वैद्य उदासीन, निराश होऊन एकाकीपणाकडे वळतात. शेवटी वैद्य सुध्दा माणूसच आहे. त्यालाही मन असतं. कारण एकाच शाखेत काम करणारे सहकारी एकमेकांकडे स्पर्धक म्हणूनच पाहतात. इतके की ते तुम्हाला अपयशी झालेले पाहण्यासाठी आतुर असतात. खरंतर अशा वेळेस वैद्यांना तुम्हीच स्वत:हुन समजून घेऊन, तुमच्या साथ ची खरी गरज असते. या सर्व अलौकिक अपेक्षा सह, वैद्य त्याच्या मानसिक आरोग्य सह अनेक संघर्ष करत राहतो.
म्हणूनच सर्व वैद्यांना मी हेच सांगु इच्छिते की, मान्य आहे ही सर्व परिस्थिती प्रत्येक वैद्यासाठी कमी जास्त प्रमाणात असेल, पण हे तेवढेच खरे आहे की आपल्याला या वास्तव्यासह जगून, लढत राहून, यातून चांगलेच शिकत राहीले पाहीजे आणि अशा परिस्थितींशी लढण्यास स्वतःला कणखर केले पाहिजे.
म्हणून जर तुम्हाला वैद्यकीय क्षेत्र निवडायचे असेल तर तुम्हाला फक्त शरीरानेच नाही तर मनाने देखील मजबूत राहणं अपेक्षित आहे.
डॉ. अक्षया विजय पवार.
(वैद्यकीय अधिकारी, सोलापूर महानगर पालिका)
तीन महिने कर्जाचा हप्ता भरू नका सांगता, मग त्यावर व्याज कसं काय लावता ?
- मे.सुप्रीम कोर्टाचा सवाल
नवी दिल्ली : करोनामुळे लॉकडाउन जाहीर करण्यात आल्याने अनेकांचं उत्पन्न बंद झालं आहे. याच पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) कर्जाचे हफ्ते ३१ ऑगस्टपर्यंत न भरण्याची मुभा दिली आहे. मात्र बँकांनी कर्जाचे हफ्ते पुढे ढकलण्याची मुभा दिली असली तरी त्यावरील व्याज मात्र वसूल केलं जाणार आहे. यासंबंधी मे.सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून त्यावर सुनावणी पार पडली.
यावेळी मे.सर्वोच्च न्यायालयाने तीन महिने कर्जाचा हप्ता भरू नका असं सांगता, मग त्यावर व्याज कसं लावता ? अशी विचारणा केली आहे. १७ जून रोजी याप्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे.न्यायमूर्ती जे अशोक भुषण यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. याचिकेत बँकांनी हफ्ते माफ करण्यात आलेल्या काळात व्याजदेखील माफ करावं अशी मागणी करण्यात आली आहे. न्यायमूर्ती जे अशोक भुषण यांनी सुनावणीवेळी विचारणा केली की, जर तुम्ही तीन महिन्यांसाठी कर्ज माफ केलं आहे तर मग तुम्ही त्यावर व्याज कसं काय लावू शकता ही आमची मुख्य काळजी आहे.
सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी यावेळी आपल्याला यासंबंधी आर.बी.आय.च्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन चर्चा करावी लागेल असं सांगितलं. एस.बी.आय.च्या वतीने मे. न्यायालयात बाजू मांडणारे वरिष्ठ वकील रोहतगी यांनीही आर.बी.आय.शी चर्चा करणं महत्त्वाचं असल्याचं यावेळी सांगितलं. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी आठवड्याच्या शेवटी आर.बी.आय.चे अधिकारी तसंच अर्थ तज्ञांसोबत बैठक घेऊ अशी माहिती दिल्याने मे.सर्वोच्च न्यायालयाने १७ जून पर्यंत सुनावणी पुढे ढकलली आहे.दरम्यान आर.बी.आय.ने याआधी उत्तर देताना मे.सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केल असून सहा महिन्यांसाठी कर्जाचे हफ्ते भरण्यासाठी सूट दिली असताना त्यावरील व्याजही माफ केलं तर दोन लाख कोटींचं नुकान होईल. मे.सर्वोच्च न्यायालयाने याचिकेवर सुनावणी करताना आर.बी.आय.ला उत्तर देण्यास सांगितलं होतं.
व्याज माफ केल्यास बँकांना खूप मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो असं बँकांचं म्हणणं आहे. बँकांवर दोन लाख कोटींचं ओझं निर्माण होईल असं आर.बी.आय.चं म्हणणं आहे.२५ मार्च रोजी आर.बी.आय.ने कर्जाचे हफ्ते न भरण्यासाठी तीन महिन्यांची मुभा देत असल्याचं जाहीर केलं होतं. यानंतर २२ जून रोजी अजून तीन महिन्यांसाठी ही सवलत जाहीर करण्यात आली.
'सैराट' कालबाह्य का ठरत नाही?
- रोजच्या रोज याच वास्तवाला का सामोरं जावं लागतं आपल्याला?
फोटोतल्या या विराजकडं बघितलं तरी मला भडभडून येतं. किती कोवळा आणि गोड, निरागस दिसतोय हा विराज. लहानपणी, म्हणजे तो अगदी नऊ महिन्यांचा असतानाच त्याचे वडील गेले. आईनं तळहातावरच्या फोडासारखं जपलं या पोराला. तो एकुलता एक. त्या माऊलीला दुसरं अपत्य नाही. पोरगा शिकेल, घराचे पांग फेडेल, हीच आशा त्या माऊलीला.
पिंपरी- चिंचवडच्या तक्षशीलानगरच्या बौद्ध विहाराजवळ राहाणारा वीस वर्षांचा विराज कॉलेजात शिकत होता. नवी स्वप्नं बघत होता. काही नराधमांनी या कोवळ्या पोराचा जीव घेतला. अमानुष अशी मारहाण केली. त्याला अवमानित केले. संपवून टाकले. पोलिसात दाखल झालेली तक्रार सुन्न करणारी आहे.
कारण काय, तर म्हणे विराजची एका मुलीसोबत मैत्री होती. त्यांचं एकमेकांवर प्रेम होतं.
प्रेम करणं हा गुन्हा कधीपासून झाला या देशात? प्रेम करताना जात बघायची, हा निकष कोणी ठरवला इथं? तरूण-तरूणी एकमेकांच्या प्रेमात पडतात, ही तर आशा आहे या जगात! द्वेष आणि विखारानं भरलेल्या या भवतालात प्रेमाशिवाय आश्वासक आणखी काय आहे?
'तू खालच्या जातीचा आहेस आणि आम्ही वरच्या जातीचे आहोत', असं निर्लज्जपणे सांगणारी माणसं एरव्ही शिवरायांचं नाव घेत असतात. शाहू महाराजांचा जयजयकार करतात. शिवराय वा शाहूंचं नाव तरी घ्यायची लायकी आहे का अशांची? ज्या शाहूंनी स्वतःच्या बहिणीचं लग्न धनगर जातीतल्या मुलाशी केलं, त्या शाहूंचा वारसा हे सांगणार! अरे, शाहू वगैरे सोडा. विलासराव देशमुखांच्या मुलांनी आंतरधर्मीय, आंतरजातीय लग्नं केली. शरद पवारांच्या मुलीनं आंतरजातीय लग्न केलं. ब्राह्मण प्रमोद महाजनांच्या बहिणीनं वंजारी असलेल्या गोपीनाथ मुंडेंशी लग्न केलं. राणा जगजितसिंह पाटील यांनी चांभार जातीतील मुलीशी लग्न केलं. यापैकी कोणालाही खालची जात वा वरची जात असं काही आठवलं नाही. आणि, तुम्ही रे कसले पाटील, की तुम्हाला आपली जात थोर आणि इतर मात्र हलक्या जातीचे वाटू लागले!
थोडी शरम, थोडीही लाज नाही वाटत? मुला-मुलीशी बोलून या विषयावर चर्चा करण्याची, मार्ग करण्याची गरज नाही भासत?
जातीच्या नावानं असे अत्याचार करणा-या नराधमांना वाचवणारी यंत्रणाही आपल्याकडं आहे, म्हणून त्यांचं फावतं.
अजून किती आग लावून, किती जणांना जाळून, या जात नावाच्या विषाणूची भूक भागणार आहे?
'प्रेम' नावाची अडीच अक्षराची गोष्ट जाळून टाकणारी 'जात' नावाची दोन अक्षरी आग आता तरी विझवली पाहिजे. नाहीतर, उद्या ही आग प्रत्येक घरात घुसून आपलं जगणं भस्मसात करून टाकेल.
'मी मराठा वा ब्राह्मण आहे, म्हणजे मी थोर' आणि, कोणी बौद्ध, मांग वा चांभार आहे, म्हणजे तो हलका, हे ज्यांच्या ज्यांच्या आजही मनात येतं, ते सगळे विराजचे मारेकरी आहेत. मुख्य म्हणजे, ब्राह्मणांना शिव्या घालताना 'शाहू-फुले-आंबेडकर' सांगायचे आणि बौद्ध पोराला मारून टाकताना मात्र मनुस्मृतीला डोक्यावर घेऊन नाचायचे, हा दुटप्पीपणा बंद झाला पाहिजे. सगळे असेच आहेत, असे नाही; पण काळजी करावे एवढे हे प्रमाण नक्कीच आहे.
आजवर गावागावात दलितांचे आणि स्त्रियांचे शोषण कोणी केले? ही व्यवस्था तयार केली ब्राह्मणी मनुवादानं. जातपितृसत्ताक व्यवस्थेनं. पण, गावागावात तिला बळ दिलं ते पाटील आणि देशमुखांनीही, हे नाकारून चालणार नाही. आज या ब्राह्मणी आणि जातपितृसत्ताक व्यवस्थेचे वाहक भलतेच आहेत. त्यात ब्राह्मणेतर आणि मराठेतरही मागे नाहीत.
जातीच्या मुद्द्याला आता वर्गीय आणि आर्थिक संदर्भ जोडले गेले आहेत हे खरे; पण मूळ मुद्दा जातपितृसत्तेचा आहे. मुला-मुलींचं लग्न जिथे पालक ठरवतात, अशी विवाहसंस्था, कुटुंबसंस्था अशी मोठी कारणपरंपरा आहे.
शिवराय, शाहू, विठ्ठल रामजी शिंदे न समजलेल्यांना आता तरी मूल्यव्यवस्था समजावून सांगावी लागेल. नराधमांना वेळीच तुरूंगात डांबावे लागेल. जातीचा माज करणा-यांची नांगी ठेचावी लागेल.
एक लक्षात घ्या. अशा जात्यंधांना जात नसते. विखार हीच त्यांची जात असते. त्यामुळे सगळ्या जातबांधवांना आरोपी मानण्याचे कारण नाही. पण त्याचवेळी हे आपल्या जातीचे आहेत, म्हणून त्यांना मदत करण्याचा वा वाचवण्याचा विचारही कोणाच्या मनात येता कामा नये.
अशा घटनांमुळे तरी जातीयवाद कमी व्हायला हवा. जातीचं निर्मूलन करण्यासाठी 'माणसां'नी उभं राहायला हवं. अशा घटनांनंतर दोन जातींमधील तेढ आणखी वाढवली जाणार असेल, तर जातीअंताकडे नव्हे, जगाच्या अंताकडे आपली वाटचाल सुरू आहे!
बदलावं लागेल आपल्याला मुळातून.
नाहीतर,
आणखी किती विराज असेच मरत जातील, हे सांगणंही अवघड आहे.
प्रेमावर हा देश उभा करायचा की विखारावर, याचं उत्तर आता तरी आपल्याला द्यावंच लागेल!
- संजय आवटे
कमी जोखमीच्या लोकांवरही लक्ष द्या-पालकमंत्री ना. बच्चू कडू यांचे निर्देश
अकोला : शहरी भागात आरोग्य तपासणी मोहिम राबविल्यानंतर व पॉझिटीव्ह रुग्णांच्या निकट संपर्कातील अति जोखमीच्या व दूरस्थ संपर्कातील कमी जोखमीच्या व्यक्तींची विगतवारी करा. अति जोखमीच्या व्यक्तींना अलगीकरणात ठेवण्यात येत असतांनाच जे कमी जोखमीचे व्यक्ती आहेत त्यांचेवरही आरोग्य यंत्रणांनी विशेष लक्ष ठेवावे, असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज येथे दिले.
आज जिल्हा नियोजन भवनात विविध आढावा बैठका घेतल्या. त्यात कोवीड १९ संदर्भातील उपाययोजनांचाही आढावा घेण्यात आला. यावेळी विधान परिषद सदस्य आ. अमोल मिटकरी, विधानसभा सदस्य आ. नितीन देशमुख, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधिक्षक अमोघ गावकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, आरोग्य उपसंचालक डॉ. फारुकी, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार तसेच अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी माहिती देण्यात आली की, मनपाने शहरात राबविलेल्या आरोग्य तपासणी मोहिमेत अद्याप ६८ हजार जणांची तपासणी केली आहे. तसेच आधीच्या पॉझिटीव्ह रुग्णांच्या तपासणीनंतर निकट संपर्कातील व्यक्ती सोडल्यास ७९६ लोक हे कमी जोखमीचे व दूरस्थ संपर्कातील आहेत. अशा लोकांच्यातही अन्य आजार असलेल्या व ज्येष्ठ नागरिक असलेल्या लोकांचे वेगळी विगतवारी करुन त्यांचेवर विशेष लक्ष आरोग्य यंत्रणांनी द्यावे, असे निर्देश ना. कडू यांनी दिले. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची सुरक्षा यंत्रणा मजबूत करा.
डॉक्टर व रुग्णांव्यतिरिक्त अन्य कोणताही व्यक्ती आत जाता कामा नये. तसेच जेवण चांगले नसल्याच्या तक्रारी अद्याप येत आहेत, हा दर्जा सुधारण्यात यावा असेही निर्देश ना. कडू यांनी दिले. तसेच जिल्ह्यातील मृत्यू दर हा चिंताजनक असून तो कमी करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न डॉक्टरांनी करावे, असेही त्यांनी सांगितले.
क्षेत्रस्तरावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी या संदर्भात काही आणखी उपाययोजना असल्यास त्या सुचवाव्या, त्यातील योग्य व चांगल्या उपाययोजनांचा अवश्य विचार केला जाईल, असेही ना. कडू यांनी आश्वस्त केले. तसेच येत्या पावसाळ्यात हवामान बदलामुळे होणारे विविध आजार लक्षात घेता आरोग्य यंत्रणांनी अधिक दक्ष रहावे, असेही ना. कडू यांनी निर्देश दिले.
यावेळी आ. मिटकरी यांनी सुचना केली की, एकीकडे शहरी भागात आरोग्य यंत्रणेला मनुष्यबळाची आवश्यकता असतांना ग्रामिण भागात डॉक्टर गैरहजर असल्याचे दिसून येते. अशा गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी सुचना त्यांनी केली.
कोविड -१९ साठी आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी विषयक मार्गदर्शक सूचना
राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागामार्फत सर्वसामान्यांसाठी कोविड -१९ साठी आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी विषयक मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर, टास्क फोर्स ऑन आयुष्य फॉर कोविड-१९ गठीत करण्यात आला होता. त्यावेळी सर्वसामान्य नागरिकांना प्रतिबंधात्मक उपाय तसेच अलक्षणिक रुग्णांवरील उपचारासाठी काही महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या आहेत.
- सामान्य प्रतिबंधात्मक उपाय:
१. वैयत्तिक स्वच्छतेचे पालन करणे.
२. वारंवार साबणाने हात २० सेकंदापर्यंत धुणे
३. खोकताना व शिंकताना तोंडावर रुमाल ठेवावा
४. ज्या व्यक्ती आजारी आहेत किंवा ज्यांना सर्दी खोकला इत्यादी आजाराची लक्षणे आहेत, अशा व्यक्तींशी जवळचा संपर्क टाळावा.
५. जिवंत प्राण्यांशी संपर्क व कच्चे न शिजवलेले मांस खाणे टाळा.
६. पशुपालन गृह तसेच जिवंत पशु विक्री केंद्र किंवा कत्तलखाने या ठिकाणी प्रवास टाळावा
आयुष उपाययोजना पुढीलप्रमाणे
१. ताजे, उष्ण व पचायला हलके भोजन घ्यावे. भोजनात अख्खी आणि ऋतूनुसार भाज्यांचा समावेश असावा
२. तुळशीची पाने, ठेचलेले आले व हळद ही द्रव्ये पाण्यात उकळून ते पाणी वारंवार पिणे फायदेशीर आहे.
३. सर्दी व खोकल्यासाठी चिमूटभर काळी मिरी, चूर्ण मधातून सेवन करणे फायदेशीर आहे.
४. कोविड-१९ लक्षणांमध्ये तुळस, गुळवेल, आले आणि हळद या सामान्य औषधी वनस्पती उपयुक्त आहेत.
५. थंड, फ्रिज मध्ये ठेवलेले व पचायला जाड असलेले पदार्थ टाळावे.
६. थंड वाऱ्याचा थेट संपर्क टाळावा.
७. विश्रांती व वेळेत झोप हितकारक आहे.
८. प्रशिक्षित योग्य तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योगासने व प्राणायाम करावे.
९. मुगाचे कढण / सूप / पाणी – मुगडाळ पाण्यात उकळून तयार केलेले मुगाचे गरम कढण / सूप / पाणी प्यावे, ते पोषक आहे.
१०. सुवर्ण दुग्ध / दुग्ध – १५० मिलीमीटर गरम दुधात अर्धा चमचा हळद व अर्धा चमचा सुंठीचे चूर्ण मिसळून हे दूध दिवसातून एकदा किंवा दोनदा प्यावे.
रोगप्रतिकारक शक्ती वाढीसाठी व रोग प्रतिबंधासाठी आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी उपचार
आयुर्वेदिक औषधी
१. संशमनी वटी १ गोळी दिवसातून दोनदा असे १५ दिवस
२. तुळस चार भाग, सुंठ दोन भाग, दालचिनी दोन भाग व काळी मिरी एक भाग या द्रव्याच्या भरड चूर्ण तयार करणे. वरील औषधीचे तीन ग्रॅम भरड चूर्ण १०० मिलिलिटर उकळलेल्या पाण्यात मिसळून ५-७ मिनिटे ठेवणे व नंतर हे पाणी पिणे.
३. च्यवनप्राश १० ग्रॅम सकाळी सेवन करणे (मधुमेही रुग्णांनी साखरविरहित च्यवनप्राश सेवन करावे.
४. सकाळ व संध्याकाळ दोन्ही नाकपुड्यांमध्ये तीळ तेल / खोबरेलतेल किंवा हे बोटाने लावावे.
५. तोंडामध्ये एक मोठा चमचा तीळतेल/ खोबरेलतेल घ्यावे व हे तेल न गिळता दोन ते तीन मिनिटे गुळण्या कराव्यात व नंतर हे तेल थुंकावे व गरम पाण्याने चूळ भरावी असे दिवसातून एकदा किंवा दोनदा करावे.
युनानी औषधी
१. बिहिदाना ५ ग्रॅम, बर्गे गावजबान ७ ग्रॅम, उन्नाब ७ दाने, , सपिस्तान ७ दाने, दालचिनी ३ ग्रॅम, बनपाशा ५ ग्रॅम यांचा काढा करून २५० मिलिलिटर पाण्यामध्ये १५ मिनिटे उकळावे व गरम असताना चहाप्रमाणे दिवसातून १ किंवा २ वेळा १५ दिवसांकरिता घ्यावे.
२. खमीरा मरवारीद दुधासोबत ५ ग्रॅम दिवसातून दोनदा घ्यावे. मधुमेही रुग्णांनी घेऊ नये.
होमिओपॅथी औषधी
१. आर्सेनिकम अल्बम ३० – ४ गोळ्या उपाशीपोटी दिवसातून दोनदा असे तीन दिवस सलग घ्यावे. एका महिन्याच्या अंतराने पुन्हा हा तीन दिवसांचा औषधांचा कोर्स करावा.
कोविड-१९ सारखी लक्षणे असणाऱ्या इतर आजारासाठी आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी उपचार
आयुर्वेदिक औषधी
१. टॅबलेट आयुष्य ६४ – (५०० मिलिग्रॅम) दोन गोळ्या दिवसातून दोन वेळा असे १५ दिवस घ्यावे
२. अगस्त्य हरितकी – ५ ग्रॅम दिवसातून दोन वेळा गरम पाण्यासोबत १५ दिवस घ्यावे.
३. अणुतेल – तीळतेल – दोन थेंब प्रतिदिन सकाळी नाकपुडीत टाकणे.
४. ताजी पुदिन्याची पाने किंवा ओवा पाण्यात उकळून त्याची वाफ दिवसातून एकदा किंवा दोनदा घ्यावी.
५. खोकला व घास खवखवत असल्यास साखर अथवा मध यामध्ये लवंग चूर्ण मिसळून दिवसातून दोन ते तीन वेळा घ्यावे.
युनानी औषधी
१. अर्धा ग्लास पाण्यामध्ये आरके अजिब ५ थेंब मिसळून गुळण्या कराव्यात, असे १५ दिवस करावे.
२. तिर्यक अर्बा – हब्बूल घर, ज्यूतिआना, मूर झरवंद तविल या सर्व घटकांचे चूर्ण तयार करून तुपामध्ये परतावे व मध गरम करून त्यामध्ये ही औषधे मिसळावीत. याचा वापर चूर्ण स्वरूपातही करता येतो, हे औषध १५ दिवस घ्यावे.
होमिओपॅथिक औषधी
१. आर्सेनिकम अल्बम ३० – ४ गोळ्या उपाशीपोटी दिवसातून दोनदा असे तीन दिवस सलग घ्यावे. एका महिन्याच्या अंतराने पुन्हा हा तीन दिवसांचा औषधांचा कोर्स करावा.
२.तसेच ब्रायोनिया अल्वा, हस टॉक्सिको डेन्ड्रॉन, बेलॉडोना जेलसेमियम, युप्याटोरियम, परफॉलीएटम ही औषधे देखील सर्दी खोकला, फ्लू समान रोगांमध्ये चिकित्सेसाठी उपयुक्त्त ठरली आहेत.
(उपरोक्त सर्व औषधे तज्ञ आयुर्वेदिक , युनानी आणि होमिओपॅथी डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच घ्यावीत )
कोविड-१९ पॉझिटिव्ह, अलक्षणिक, चिकित्सालयीन तपासणीनुसार स्थिर असणाऱ्या व इतर वर्तमान गंभीर व्याधीरहित रुग्णांकरिता प्रस्थापित चिकित्सेला पूरक आयुर्वेद व होमिओपॅथी उपचार
आयुर्वेदिक औषधी
१. टॅबलेट आयुष्य ६४ – (५०० मिलिग्रॅम) दोन गोळ्या दिवसातून दोन वेळा असे १५ दिवस घ्यावे किंवा टॅबलेट सुदर्शन घनवटी – २५० मिलिग्रॅम दोन गोळ्या दिवसातून दोन वेळा असे १५ दिवस घ्यावे.
२. अगस्त्य हरितकी – ५ ग्रॅम दिवसातून दोन वेळा गरम पाण्यासोबत १५ दिवस घ्यावे.
३. अणुतेल – तीळतेल – दोन थेंब प्रतिदिन सकाळी व संध्याकाळी नाकपुडीत टाकणे.
४. तोंडामध्ये एक मोठा चमचा तीळतेल/ खोबरेलतेल घ्यावे व हे तेल न गिळता दोन ते तीन मिनिटे गुळण्या कराव्यात व नंतर हे तेल थुंकावे व गरम पाण्याने चूळ भरावी असे दिवसातून एकदा किंवा दोनदा करावे.
५. गरम पाण्याची वाफ दोनदा किंवा तीनदा घ्यावी.
होमिओपॅथिक औषधी
१.कोविड -१९ समान रोगांच्या लक्षणांच्या चिकीत्सेकरिता नमूद औषधांचा वापर हा प्रस्थापित चिकीत्सेस पूरक चिकित्सा म्हणून केला जाऊ शकतो. त्यामुळे सर्व औषधे तज्ञ आयुर्वेदिक व होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच घ्यावे.
कोविड -१९ या संसर्गजन्य आजाराची लक्षणे जाणविल्यास तात्काळ चाचणी करून घेणे व डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेणे आवश्यक राहील.
सिर्फ़ उम्मीद से पत्रकारिता नहीं चलती है
पत्रकारिता बिनाका गीतमाला नहीं है। फ़रमाइश की चिट्ठी लिख दी और गीत बज गया। गीतमाला चलाने के लिए भी पैसे और लोग की ज़रूरत तो होती होगी। मैं हर दिन ऐसे मैसेज देखता रहता हूँ। आपसे उम्मीद है। लेकिन पत्रकारिता का सिस्टम सिर्फ़ उम्मीद से नहीं चलता। उसका सिस्टम बनता है पैसे से और पत्रकारिता की प्राथमिकता से। कई बार जिन संस्थानों के पास पैसे होते हैं वहाँ प्राथमिकता नहीं होती, लेकिन जहां प्राथमिकता होती है वहाँ पैसे नहीं होते। कोरोना के संकट में यह स्थिति और भयावह हो गई है।
न्यूज़ कवरेज का बजट कम हो गया है। इसमें ख़बर करने वाले पत्रकार भी शामिल हैं। पिछले दिनों अख़बार बंद हुए। ब्यूरो बंद हो गए। बीस बीस साल के अनुभव वाले पत्रकार झटके में निकाल दिए गए। ख़बर खोजने का संबंध भी बजट से होता है। गाड़ी घोड़ा कर जाना पड़ता है। खोजना पड़ता है।बेशक दो चार लोग कर रहे हैं लेकिन इसका इको सिस्टम ख़त्म हो गया। कौन ख़बर लाएगा ? ख़बर लाना भी एक कौशल है। जो कई साल में निखरता है। अनुभवी लोगों के निकाल देने से ख़बरें का प्रवाह बुरी तरह प्रभावित होता है।
यही नहीं ज़िला में काम करने वाले अस्थायी संवाददाताओं का बजट भी समाप्त हो गया। स्ट्रिंगर भी एक सिस्टम के तहत काम करता है। वो सिस्टम ख़त्म हो गया। अब कोरोना काल में जब विज्ञापन हुए तो उसके कारण कई पत्रकार निकाल दिए गए। न्यूज रूम ख़ाली हो गए। ज़्यादातर पत्रकार बहुत कम पैसे में जीवन गुज़ार देते हैं। कोविड 19 में छँटनी से वे मानसिक रूप से तबाह हो गए होंगे।
वैसे चैनलों में रिपोर्टर बनने की प्रथा कब की ख़त्म सी हो गई थी। ख़त्म सी इसलिए कहा कि अवशेष बचे हुए हैं। आपको कुछ रिपोर्टर दिखते हैं। लेकिन वही हर मसले की रिपोर्टिंग में दिखते हैं। नतीजा यह होता है कि वे जनरल बात करके निकल जाते हैं। उनका हर विभाग में सूत्र नहीं होता है न ही वे हर विभाग को ठीक से जानते हैं। जैसे कोरोना काल में ही देखिए। टीवी पर ही आपने कितने रिपोर्टर को देखा जिनकी पहचान या साख स्वास्थ्य संवाददाता की है ? तो काम चल रहा है। बस।
आप किसी भी वेबसाइट को देखिए। वहाँ ख़बरें सिकुड़ गई हैं। दो चार ख़बरें ही हैं। उनमें से भी ज़्यादातर विश्लेषण वाली ख़बरें हैं। बयान और बयानों की प्रतिक्रिया वाली ख़बरें हैं। यह पहले से भी हो रहा था। लेकिन तब तक ख़बरें बंद नहीं हुईं थीं। अब ख़बरें बंद हो गईं और डिबेट बच गए हैं। डिबेट के थीम ग्राउंड रिपोर्टिंग पर आधारित नहीं होते हैं। जिस जगह पर रिपोर्टिंग होनी चाहिए थी उस जगह को तथाकथित और कई बार अच्छे विशेषज्ञों से भरा जाता है। आप जितना डिबेट देखते हैं उतना ही ख़बरों का स्पेस कम करते हैं। कई बार डिबेट ज़रूरी हो जाता है लेकिन हर बार और रोज़ रोज़ नहीं। इसके नाम पर चैनलों के भीतर रिपोर्टिंग का सिस्टम ख़त्म कर दिया गया। कोरोना के बहाने तो इसे मिटा ही दिया गया। सरकार के दबाव में और सरकार से दलाली खाने की लालच में और अर्थ के दबाव में भी।
मीडिया में राजनीतिक पत्रकारिता पर सबसे अधिक निवेश किया गया। उसके लिए बाक़ी विषयों को ध्वस्त कर दिया गया। आज राजनीति पत्रकारिता भी ध्वस्त हो गई। बड़े बड़े राजनीतिक संपादक और पत्रकार ट्विटर से कापी कर चैनलों के न्यूज ग्रुप में पोस्ट करते हैं। या फिर ट्विटर पर कोई प्रतिक्रिया देकर डिबेट को आगे बढ़ाते रहते हैं। बीच बीच में चिढ़ाते भी रहते हैं ! प्रधानमंत्री कब बैठक करेंगे यह बताने के लिए चैनल अभी भी राजनीतिक पत्रकारों में निवेश कर रहे हैं । साल में दो बार मीठा मीठा इंटरव्यू करने के लिए।
दूसरा रिपोर्टिंग की प्रथा को समाज ने भी ख़त्म किया। इस पर विस्तार से बोलता ही रहा हूँ। फिर भी अपनी राजनीतिक पसंद के कारण मीडिया और जोखिम में डाल कर ख़बरें करने वालों को दुश्मन की तरह गिनने लगा। कोई भी रिपोर्टर एक संवैधानिक माहौल में ही जोखिम उठाता है जब उसे भरोसा होता है कि सरकारें जनता के डर से उस पर हाथ नहीं डालेंगी। राजनीतिक कारणों से पत्रकार और एंकर निकाले गए लोग चुप रहे । यहाँ तक तो पत्रकार झेल ले गया। लेकिन अब मुक़दमे होने लगे हैं। हर पत्रकार केस मुक़दमा नहीं झेल सकता है। उसकी लागत होती है। कोर्ट से आने वाली ख़बरें आप नोट तो कर ही रहे होंगे।
इसलिए जब आप कहते हैं कि ये खबर कर दीजिए, वो दिखा दीजिए। अच्छी बात है। लेकिन तब आप नहीं चौकस होते जब पत्रकारिता के सिस्टम को राजनीतिक और आर्थिक कारणों से कुचल दिया गया। बेशक संस्थानों की भी इसमें भूमिका रही लेकिन आप खुद से पूछें दिन भर में छोटी मोटी साइट पर लिख कर गुज़ारा करने वाले कितने पत्रकारों की खबरों को साझा करते हैं ?
आपको यह समझना होगा कि क्यों दिल्ली की ही ख़बरें हैं क्योंकि गुजरात में ब्यूरो नहीं है। संवाददाता नहीं है। हिमाचल प्रदेश, उत्तराखंड छत्तीसगढ़ केरल या बंगाल और असम में नहीं है। जहां है वहाँ अकेला बंदा या बंदी है। ब्यूरो के पत्रकार बिना छुट्टी के साल भर काम करते हैं। उनका बजट बहुत कम है। दूसरा राज्य सरकारें केस मुक़दमा करने लगी हैं। तीसरा लोग आई टी सेल बन कर साहसिक पत्रकारों को गाली देने लगे हैं। और अब संपादक या संस्थान दोनों ऐसी खबरों की तह में जाना ही नहीं चाहते। बीच बीच में एकाध ऐसी खबरें आ जाती हैं और चैनल या अख़बार पत्रकारिता का ढिंढोरा पीट कर सो जाते हैं। फिर सब ढर्रे पर चलता रहता है।
इस प्रक्रिया को समझिए। पाँच साल से तो मैं ही अपने शो में कहता रहा हूँ, लिखता रहा हूँ , बोलता रहा हूँ कि मैं अकेला सारी ख़बरें नहीं कर सकता और न ही संसाधन है। आप दिल्ली के ही चैनलों में पता कर लें, दंगों की एफ आई आर पढ़ने वाले कितने रिपोर्टर हैं, जिन्हें चैनल ने कहा हो कि चार दिन लगा कर पढ़ें और पेश करें। मैं देख रहा था कि यह हो रहा है। इसलिए बोल रहा था। लोगों को लगा कि मैं हताश हो रहा हूँ । उम्मीद छोड़ रहा हूँ। जबकि ऐसा नहीं था। अब आप किसी पर उम्मीद का मनोवैज्ञानिक दबाव डाल कर फ़ारिग नहीं हो सकते।
पत्रकारिता सिर्फ़ एक व्यक्ति से की गई उम्मीद से नहीं चलती है। सिस्टम और संसाधन से चलता है। दोनों ख़त्म हो चुका है। सरकारी विज्ञापनों पर निर्भर मीडिया से अगर आप उम्मीद करते हैं तो आप बेहद चालाक हैं। आलसी हैं। मुश्किल प्रश्न को छोड़ कर पहले आसान प्रश्न ढूँढने वाले छात्रों को पता है कि यही करते करते घंटी बज जाती है। परीक्षा ख़त्म हो जाती है। इसलिए इनबॉक्स में अपनी तकलीफ़ ज़रूर ठेलिए, मगर हर बार उम्मीद मत कीजिए।
(यह लेख मूल रूप से रवीश कुमार के फेसबुक पेज पर प्रकाशित हुआ है.)
लॉकडाउन के दौरान नागरिकों के खिलाफ पुलिस कार्रवाई पर स्वत: संज्ञान लिया, राज्य और केंद्र को नोटिस जारी
- COVID 19 महामारी से हम सभी प्रभावित हुए हैं, लेकिन इस दौरान हमारे कानून चुप नहीं रह सकते उन्हें हमारे नागरिकों के अधिकारों की रक्षा करने के लिए काम करना जारी रखना चाहिए यह हमारे न्यायशास्त्र में अच्छी तरह से स्थापित है कि हमारे संविधान के अनुच्छेद 21 के तहत जीवन और व्यक्तिगत स्वतंत्रता का मौलिक अधिकार, आपातकाल के दौरान भी निलंबित नहीं किया जा सकता है इस न्यायालय को नागरिकों पर संवैधानिक अधिकारों के उल्लंघन के आरोप के रूप में आए संकट के लिए सतर्क होना चाहिए.
केरल हाईकोर्ट ने कथित रूप से देशव्यापी लॉकडाउन का उल्लंघन करने वाले व्यक्तियों के खिलाफ, पुलिस की बर्बरता की कथित घटनाओं का संज्ञान लिया है.
न्यायमूर्ति ए.के. जयशंकरन नांबियार और न्यायमूर्ति शाजी पी चैली ने गैर-कानूनी पुलिस ज्यादतियों के मामले में राज्य के अधिकारियों के साथ-साथ भारत संघ को भी नोटिस जारी किए हैं पीठ ने माना कि कोरोना वायरस के संचरण की श्रृंखला को तोड़ने के लिए सामाजिक दूरी बनाए रखना जरूरी है और इस प्रकार राज्य ने भीड़ जमा न हो, इसे प्रतिबंधित करने के लिए पुलिस बलों की तैनाती की थी हालांकि, अदालत ने कहा कि वह मीडिया रिपोर्टों को नजरअंदाज नहीं कर सकती, जिनमें ऐसे पुलिस कर्मियों द्वारा हिंसा के उपयोग का खुलासा किया गया है.
- पीठ ने कहा,
हालांकि हम प्रिंट और सोशल मीडिया में बहुत सारी सामग्री देख चुके हैं, जो हमें विश्वास दिलाती हैं कि स्वास्थ्य अधिकारियों और पुलिस कर्मियों द्वारा अनुकरणीय कार्य किया जा रहा है हम कुछ लोगों की ओर आंख नहीं मूंद सकते हैं अन्य सामग्री जो पिछले एक सप्ताह में प्रिंट, इलेक्ट्रॉनिक और सोशल मीडिया में प्रकाशित हुई है, जो पुलिसकर्मियों द्वारा अपने कर्तव्यों के निर्वहन के दौरान की गई ज्यादतियों को इंगित करती है अदालत ने कहा कि संकट की इस स्थिति में भी, लोगों के मौलिक अधिकारों का उल्लंघन करने की अनुमति नहीं दी जा सकती.
- पीठ ने कहा,
COVID 19 महामारी से हम सभी प्रभावित हुए हैं, लेकिन इस दौरान हमारे कानून चुप नहीं रह सकते उन्हें हमारे नागरिकों के अधिकारों की रक्षा करने के लिए काम करना जारी रखना चाहिए.
यह हमारे न्यायशास्त्र में अच्छी तरह से स्थापित है कि हमारे संविधान के अनुच्छेद 21 के तहत जीवन और व्यक्तिगत स्वतंत्रता का मौलिक अधिकार, आपातकाल के दौरान भी निलंबित नहीं किया जा सकता है इस न्यायालय को नागरिकों पर संवैधानिक अधिकारों के उल्लंघन के आरोप के रूप में आए संकट के लिए सतर्क होना चाहिए.
इस प्रकार यह सुनिश्चित करने के लिए मामले का संज्ञान लिया गया कि राज्य में लॉकडाउन का कार्यान्वयन न्यायपालिका की "चौकस आंखों" के तहत किया जाए हमें अपने मौलिक अधिकारों के उल्लंघन के संबंध में भी नागरिकता के बीच भय को दूर करना है हम इस विचार के हैं कि केंद्र या राज्य के अधिकारियों द्वारा इस राज्य में लॉकडाउन का कार्यान्वयन, चौकस निगाहों के तहत होना चाहिए..
ऑर्डर की प्रति पड़ने के लिए यहां क्लिक करें