पर्यावरण जनजागृतीमध्ये माध्यमांची भूमिका महत्त्वाची




  • वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन
  • दै. अमरावती दर्शनच्या 'दीपदर्शन' विशेषांकाचे थाटात प्रकाशन
  • केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही केले कौतुक

अमरावती (प्रतिनिधी)  :-  पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करण्यात माध्यमांची भूमिका अतिशय महत्त्वाची ठरते. सकारात्मक दृष्टीने जर माध्यमांनी पर्यावरण पूरक भूवमका पार पाडली तर तळागाळात त्याचा खूप मोठा बदल दिसून येईल याचा मला विश्वास आहे.  केवळ कायदे आणि नियम करून पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन होणार नाही. वृत्तपत्रे, टीव्ही चॅनेल, मासिके, लोककला, चित्रकला, कविता, लेख या विविध माध्यमातून अभिव्यक्त होत पर्यावरण संरक्षणाविषयी जनजागृती होणे गरजेची आहे, असे प्रतिपादन राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. दै. अमरावती दर्शनच्या 'दीपदर्शन' या विशेषांकाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याहस्ते थाटात प्रकाशन पार पडले. यावेळी दै. अमरावती दर्शनच्या संपादक प्रगती डोईफोडे, मुख्य उपसंपादक मुकेश चौधरी उपस्थित होते. पुढे बोलतांना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले कि दैनिक 'अमरावती दर्शन'ने पर्यावरणाशी सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. पर्यावरण तसेच राज्यातील वन विभाग, व्याघ्र प्रकल्प आदींवर दै. 'अमरावती दर्शन'ने नेहमीच सकारात्मक भूमिका बजावली आहे. 'दीपदर्शन' विशेषांकामध्ये देखील ज्वलंत विषयावर सखोल विश्लेषण करण्यात आले आहे. जगातील प्रत्येक माणसामध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती करणे आणि संपूर्ण माध्यमांनी पर्यावरणाबाबत पुढाकार घेणे गरजेचे आहे. आपला देश सर्व क्षेत्रात प्रगतीपथावर असताना आपण पर्यावरणाच्या प्रगतीकडे डोळेझाक करुन चालणार नाही. निसर्गावर अन्याय करतो हे आपण त्सुनामी, नरगिससारखी सागरी वादळे, भूकंप, ढग फूटी, महापूर, दुष्काळ रोगराई अशा अनेक नैसर्गिक प्रकोपाद्वारे जाणवला आहे. माध्यमांद्वारे मोठ्या प्रमाणात जनजागृती झाल्यास पर्यावरणाचा समतोल राखण्यास हातभार लागेल आणि खर्‍या अर्थाने समृद्धीच्या दिशेने वाटचाल करु, असे हि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुद्धा दै. अमरावती दर्शनच्या 'दीपदर्शन' विशेषांकाचे भरभरून कौतुक केले. यावेळी त्यांनी दीपदर्शनचा अंक चाळून बघितला. राज्याचं सध्याचं वनक्षेत्र हे २० टक्के इतके आहे. राष्ट्रीय आणि राज्य वननीतीनुसार ते ३३ टक्क्यांपर्यंत असायला हवे.त्यासाठी हरित महाराष्ट्राच्या निर्मितीचा ध्यास घेऊन महाराष्ट्राच्या वनमंत्र्यांनी अनेक महत्वाकांक्षी पावलं टाकली आहेत. येत्या तीन वर्षात ५० कोटी वृक्ष लागवडीचा त्यांचा संकल्प घेतल्याचे ना. नितीन गडकरी म्हणाले. या विशेषांकामध्ये अरण्यऋषी मारुती चितमपल्ली, राज्य वन्यजीव बोर्डाचे सदस्य किशोर रिठे, वन्यजीव अभ्यासक प्रदीप हिरुरकर, यादव तरटे पाटील , इतिहास संशोधक ज्ञानेश्वर दमाहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मा. गो. वैद्य, मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर, अंनिसचे प्रा. शाम मानव, मिरझा रफी अहेमद बेग, प्रा. एकनाथ तट्टे शेतकरी नेते विजय विल्हेकर, सामाजिक कार्यकर्त्या रझिया सुलताना, अशोक भेलके, निसर्ग कट्टाचे अमोल सावंत, हाशमी शेख, प्रा. शोभा रोकडे, गोविंद शेंडे, प्रा. बबन नाखले, सुनील इंदुवामन ठाकरे, डॉ. संजीवनी पचलोरे, विकास बांबल आदींनी अभ्यासपूर्ण या विशेषांकात लिखाण केले आहे हे विशेष.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post