तर ठाणेदार आव्हाळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, शिक्षक व विद्यार्थी यांचे नाते अतूट असते, ते जपावे व स्पर्धेत टिकून राहण्याकरिता परिश्रम करावे.यावेळी आपले अध्यक्षीय विचार व्यक्त करताना संजय तायडे यांनी देखील विद्यार्थ्यांच्या सुप्तकलागुणांना समोर आणण्या करता व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे कार्य शाळा करते.
विद्यार्थ्यांमधून कलाकार निर्माण झाले तर निश्चित ती सर्वात सम्मानाची बाब ठरेल असे मत व्यक्त केले.नर्सरी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध न्रुत्यांचे अत्यंत सुंदर असे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे संचालन शहाकर मॅडम यांनी केले. तर प्रा.पंत सर यांनी आभार व्यक्त केले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वीकरिता शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.