- फसव्या शासनाकडून शेतकऱ्यांची आता पीकविम्यातही फसवणूक
मक़सूद अली
यवतमाळ: दिनांक 18 जून 2018, सातत्याने नैसर्गिक व शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे संकटांची मालिका झेलणाऱ्या शेतकऱ्यांवर आता पुनः एक संकट पुढे येत आहे ते म्हणजे पीक विम्याचे, ऑनलाइन पीक विमा योजनेत समाविष्ट करतांना शासनाने यवतमाळ जिल्यातील प्रत्येक तालुक्यात प्रत्येक तहसील कार्यालयात ऑफ लाईन पीक विमा 29 जुलै 2017 पर्यंत ऑनलाइन व पुढील तीन दिवस ऑफ लाईन पद्धतीने शेतकऱ्यांकडून भरून घेतले व रीतसर पावत्याही दिल्यात परन्तु आता अनेक संकटांचा सामना करीत उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना आता ऑफलाईन पीकविमा भरणाऱ्या शेतकऱ्यांना अपात्र ठरविण्याचा गोरखधंदा शासनाने व पीक विमा कंपन्यांकडून सुरू आहे दारव्हा तालुक्यात 2270 शेतकरी, बाभूळगाव तालुक्यात 690 शेतकरी, नेर तालुक्यात 1200 शेतकरी अपात्र ठरली व संपूर्ण जिल्ह्यात अश्या किमान 11000 शेतकरी अपात्र आहेत ही बाब म्हणजे अन्याय अत्याचाराच्या बाबतीत इंग्रज राजवटी ला लाजविणारी आहे असे प्रतिपादन यवतमाळ वाशिम लोकसभा युवक काँग्रेस चे अध्यक्ष राहुल ठाकरे यांनी केले ते पुढे म्हणाले की आर्थिक रित्या अत्यंत अडचणीत असतांनाही पेरण्या सुरु असतांना पोटाला कसून शेतकऱ्यांनी ऑफ लाईन विमा भरला त्यांना अडचणीत मदत देण्याच्या ऐवजी त्यांच्या तोंडाला पाने पुसणे हा प्रकार नक्कीच निषेधार्थ असून आपण अश्या शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपने उभे असून शेवटच्या शेतकऱ्याला न्याय भेटेपर्यंत आपण शांत बसणार नाही व आपण तीव्र आंदोलन करून शासनाला अश्या शेतकऱ्यांना मदत देण्यास भाग पाडू अशेही राहुल ठाकरे पुढे म्हणाले.