उमरगा तालुका / प्रतीनिधी चेतन पवार
उस्मानाबाद – तालुक्यातील अनाळा जिल्हा परिषद गटात पोटनिवडणुकीत अंत्यत अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचा भगवा कायम राहीला . शिवसेनेचे उमेदवार धनंजय उत्तम सावंत हे तब्बल 1300 मतांनी विजयी झाली आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दत्ता पाटील यांचा दारुण पराभव केला. या निवडणुकीत दोन्ही पक्षांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. या निवडणुकीत शिवसेना ,भाजप, आरपीआय, रासप व रयत क्रांतीयांची महायुती झाली होती यामध्ये महायुती कडुन धनजंय सांवत तर राष्ट्रवादी काँग्रेसकडुन पांरंपारीक प्रतीस्पर्धा दत्तात्रय पाटील यांच्यात जोरदार लढत झाली होती या निवडणुकीत काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, व एका अपक्षानेही नशिब उन जाव ल होते परंतु सेना, राष्टवादी सोडुन एकाही पक्षाला अनामत रक्कमही सांभाळता आली नाही राष्ट्रवादी काँग्रेसने हि जागा जिंकली असती तर जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला स्पष्ट बहुमताचा आकडा गाठता आला असता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसनं ही जागा जिंकण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. मात्र त्यामध्ये त्यांना यश आलं नाही. दुसरीकडे शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांनीही जोरदार ताकद लावत भाजपचाही पाठिंबा मिळवत आमदार सुजितसिंह ठाकुर साहेबांना प्रचारात उत्तरवले होते. त्यांचा शिवसेनेला मोठा फायदा झाला. या गटात यापूर्वी शिवसेनेचेच गौतम लटके हे सदस्य होते. परंतु त्यांना तीन अपत्य असल्यामुळे न्यायालयाने त्यांची निवड रद्द ठरवली होती. यामुळे हि पोटनिवsणुक लागली होती या अंत्यत अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत सेनेचे धनंजय सावंत यांना ६८०० मते मिळाली तर राष्ट्रवादीचे दत्तात्रय पाटील यांना ५५०० म ते पडली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्री दत्तात्रय पाटील यांचा गत निवडणुकीत अगदी दोनशे सत्तर मतांनी पराभय झाला होता तर या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा तब्बल तेराशे मतांनी पराभाव झाला आहे तर बाकीच्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली या ठिकानी निकालाची घोषणा होताच महायुतीच्या समर्थकानी पृचंड घोषणाबाजी करत व फटाक्यांची आतषबाजी करत मोठा जलोष केला यावेळी भैरवनाथ कारखानास्थळी जल्लेष करत विजयी सभा झाली यावेळी विजयी उमेदवार धनजंय सांवत, शिवसेना गटनेते तथा जि.प. सदस्य दत्ता साळुके, माजी सदस्य गौतम लटके, आर पीआयचे प्रदेश सरचिटणीस संजयकुमार बनसोडे, शिवसेना तालुकाप्रमुख आण्णा जाधव, भुमचे तालुकाप्रमुख सुरेश भाऊ कांबळे, भाजपाचे निशिकांत क्षिरसागर, उपसभापती मेघराज पाटील, कंडारीचे राहुल डोके, जोतीराम क्षिरसागर, यांच्यासह हजारो कार्यकर्यानी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला.