तेल्हारा येथे किसान सशक्तीकरण मेळावा

जाहिरात

तेल्हारा :- प्रजापिता ब्रम्हकुमारी इस्वरीय विश्व विद्यालय शाखे तर्फे ३० मी बुधवार भागवत मंगल कार्यालय येथे किसान सशक्तीकरण मेळाव्याचे आयोजन केले आहे. रासायनिक खते कीटक नाशके यांच्या अतिवापराने जमिनीची गुणवत्ता खालावली आहे यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्न कमी होत आहे. तर कृषी खर्चात वाढ अपुरा मोबदला अनैसर्गिक, नैसर्गिक हप्ता यासर्व परिस्थितीला शेतकरी तोंड देत आहे.या संकाटापुढे जावून काही शेतकरी आपले मनोबल खचवून आत्म्हत्यास प्रवृत्त होत आहेत. शेतकऱ्यांचे मनोबल खचू नये याकरिता ३० मे ला किसान सशक्तीकरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेल्याव्याचे प्रमुख वक्ते राजयोगी भ्राता ब्र.कु. महेंद्रजी ठाकूर मुंबई येथून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याकरिता येणार आहेत. या मेळाव्याचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रजापिता ब्रम्हकुमारी इस्वरीय विश्व विद्यालय तेल्हारा शाखे तर्फे केले आहे.
जाहिरात

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post