![]() |
प्रतिनिधी मकसूद अली सह सय्यद मोहसीन यवतमाळ
जम्मू काश्मीर मधील कठुआ येथील आसिफा या ८ वर्षीय बालिकेवर तसेच गुजरात येथील ११ वर्षीय मुलीवर सतत ८ दिवस आणि उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे झालेल्या अमानुष बलात्कार व हत्येच्या निषेधार्थ २० एप्रिल ला यवतमाळ मधे डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक पाटीपूरा ते जिल्हा कचेरी पर्यंत महा निषेध मोर्चा काढण्यात आला यात शेकळो महिला, लहान मुले यांचा देखील समावेश होता.भारतात विविध राज्यात मुलींवर बलात्कार करून हत्या करणाऱ्याना शासनाने फाशी ची शिक्षा देऊन या मुलींना व त्यांचा परीवाराला न्याय द्यावे जेणेकरून भारतात अश्या प्रकारच्या कृत्य करणार्यांवर अंकुश लावता येईल.केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आल्यापासून महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
![]() |
पण दुर्देवाने सरकार महिला सुरक्षेसाठी कोणतीही ठोस पावले उचलत नाही. राज्यात भाजपचे सरकार आल्यापासून महिला व बालिकांवरील अत्याचारात ३६ टक्के वाढ झाली आहे. याच्या निषेधार्थ सर्व समाजाच्या नागरिकाने एकत्र येऊन यवतमाळ येथील मोर्चात सहभाग नोंदविला तसेच मानवतावादी विविध संघटनेच्यावतीने या निषेध मोर्चाला समर्थन देण्यात आले व भारत सरकारला निवेदन पाठविण्यात आले की दोषींवर कडक कारवाही करण्यात यावी व हिंदू जागृती मंच सारख्या संघटनांवर बंदी घालण्यात यावी.