मूर्तिजापूर :-येथील प्रतिथयश लेखक,कवी रवींद्र जवादे यांचा 'दिवेलागण' हा ललितलेखसंग्रह ,नागपूर येथील प्रसिद्ध प्रकाशन संस्था , विजय प्रकाशन व्दारा प्रकाशीत केला आहे.
महाराष्ट्रातील नामवंत वृत्र- पत्रांच्या पुरवण्यांमधून व प्रसिद्ध दिवाळी अंकांमधून या मधील लेख प्रकाशीत झालेले आहेत. प्रत्येक ललित लेखात वाचकाला गुतंवून ठेवण्याचे कसब आहे.त्याचप्रमाणे यातील चित्रेही आशयाला अनुरुप झालेली आहेत वाचकप्रिय झालेल्या या लेख संग्रहाला , विदर्भसाहित्य संघ नागपूर,अभिव्यक्ती लेखिका संघ नागपूर,कुसुमावतीभीमराव जाधव,राज्यस्तरीय पुरस्कार, बुलढाणा,स्व.सुदाम सावरकर उत्कृष्ट पुरस्कार अमरावती व आता नुकताच प्राप्त झालेला पाचवा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार मातोश्री स्व.सूर्यकांतादेवी रामचंद्रजी पोटे,अमरावती असे राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. आतापर्यंत रवींद्र जवादे यांची दहा पुस्तके प्रकाशीत झालेली आहेत. त्यांच्या 'सांजरंग' या कादंबरीवर 'प्रेमरंग' हा चित्रपट लवकरच येत आहे.
त्यांच्या यशा बदद्ल रामकृष्ण आसरे, प्रा.प्रमोद राजंदेकर, विलास वानखडे, प्रमोद पंत,प्रा. प्रशांत पंत,शैलेश गिरी,विष्णु लोडम,विनोद महल्ले,नामदेव भडगुरुजी,किशोर आष्टीकर,सुनिल वानखडे,दिवाकर सोनोने , मीना जवादे , निलीमा आष्टीकर,योगिता वानखडे,सुनिता इंगळे तसेच सृजन साहित्य संघ,कांता फाऊंडेशन व शब्ददीप बहुउदेशीय संस्था,मूर्तिजापूर हयांच्या पदाधी काऱ्यांनी अभिनंदन केले आहे.