देशातील अभियांत्रीकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सहभागातून उन्नत भारत अभीयान जलद गतीने राबविणार - पद्मभुषण डाॅ. विजय पी. भटकर




  •  प्रत्येक खेडेगाव ही एक प्रयोगशाळा. 
  •  अकोला जिल्हयातुन अभियानाची सुरवात.
  •  शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयाने सहा गावे            घेतली दत्तक.


विलास नस्ले 
मुर्तिजापूर प्रतिनीधी :- ग्रामीण क्षेत्रातल्या समस्या अडचणी आणि गावा गावातील वेगवेगळया गरजा यांचा पायाभूत अभ्यास करून गावांमधील समस्या कायम स्वरूपी निकाली निघाव्यात किंवा त्या समस्यांचे स्वरूप अल्प राहावे याकरिता उन्नत भारत अभियानाला गती देण्यासाठी देशभरातील अभियांत्रीकी महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक आणि विद्यार्थी यांचा समावेश करून प्रत्येक महाविद्यालयाने 5 गावे दत्तक घेवून निरीक्षणे करून  अहवाल सादर करावा . देेशातूून  पन्नास  लाख विद्यार्थ्यांचा समावेश अपेक्षीत असल्याने अभीयानाला गती येणार आहे. चार भिंतीच्या आत मिळणारे शिक्षणा सोबतच इंजीनीयरिंगची परिभाषा बदलवून अनुभवातुन ग्रामीण क्षेत्राचा अभ्यास करून गावांचा विकास आणि समाजाच्या उतथानाकरिता नाविन्यपूर्ण योजनेतून   ,कल्पकतेतुन गावासाठी आणि गावक-यांचे जिवनमान विकासात्मक व आरोग्यदायी  सुलभ व सक्षम होण्याकरीता 5 महत्वपूर्ण बाबी ठरविण्यासाठी या विद्यार्थ्यांची भुमिका महत्वपुर्ण राहणार आहे. गावालाच प्रयोगशाळा समजवून हे नविन आव्हान विद्यार्थी, प्राचार्य, प्राध्यापक नक्कीच स्वीकारतील .प्रत्येक गावासाठी 50 लाख ते 2 कोटी रूपयांचा निधी पंचवार्षिक योजनेतुन दिला जातो .तरी देखील ग्रामीण क्षेत्राची परीस्थीती दुर्दशाग्रस्त आहे. त्यामुळे हा पैसा कोठे खर्च होतो हे कळायला मार्ग नाही.उन्नत भारत अभियान लोकसहभाग आणि सामाजीक संस्था यांच्या द्वारा राबविल्या जाईल. हळूहळू देशातील इतरही महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी यांचा सहभाग घेवून गतीमानातुन गावांच्या मुलभूत गरजा  व समस्या सोडविण्याचा प्रयत्न राहील असे पद्मभुषण  डाॅ. विजय पी. भटकर यांनी मुर्तिजापूर तालुक्यातील जन्मगाव मुरंबा येथे पत्रकारांशी वार्तालाप करतांना स्पष्ट केले.अकोला जिल्हयातील बाभुळगाव येथील शिवाजी अभियांत्रीकी महाविद्यालयाद्वारा ग्राम मुरंबा, हिवरा कोरडे, पडसोळा, मधापुरी, हिरपुर हि मुर्तिजापूर तालुक्यातील गावे अभ्यासाकरिता दत्तक घेण्यात आली आहे. प्रत्येक गावात जावून स्थानिक लोकांशी चर्चा करून आम्ही विद्यार्थी म्हणूनच गावात कार्य करणार असे. प्राचार्य डाॅ. देशमुख  यांनी सांगितले. यावेळी प्राध्यापक निमवाल, प्रा. डाॅ.नेमाडे, प्रा. डाॅ.झामरे, प्रा. ताथोड, प्रा. आनंद पांडे उपस्थित होते. पत्रकारांशी वार्तालापवेेळी डाॅ. वाघ ,दिनेश भटकर, अनुप भटकर, श्री.दादा जोशी ,मारूती पाटेकर,मुुुुकेश मेेेहत्रे पुणे उपस्थित होते. शिवाजी अभियांत्रिकी महावि़द्यालय बाभुळगांव द्वारा बाभुळगांव गावातच विविध उपक्रम राबविण्यास सुरवात केली आहे. गावामध्ये कंपोस्ट खत, सोलर विज निर्मिती, डिजीटल शाळा यांचा समावेश आहे.मुुुुरंबा गावात विविध उपक्रम राबविण्यात येत आहे.


SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post