
रावेर :- सातपुड्याच्या कुशीतील आदीवासी बांधवांच्या रोजगार निर्मीती आणि व्यवसाय वृद्धीसाठीवन विभागाच्या संकल्पनेतून संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून साकारण्यात आलेले वन धन, जन धन किरकोळ विक्री केंद्राचे उद्धाटन करण्यात आले
जंगलातील रानमेव, भाजीपाला, फळे आणि आदिवासी बांधवांनी तयार केलेल्या कलाकुसरीच्या वस्तू, वनौषधी या विक्रीसाठी ठेवण्यात येत असून या केंद्राचे उद्घाटन आमदार हरिभाऊ जावळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती जीप उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, प स सभापती सौ माधुरी नेमाडे, उपवनसंरक्षक प्रकाश मोरणकर, जीप माजी शिक्षण सभापती सुरेश धनके, तहसीलदार विजय ढगे, संजय गांधी निराधार समिती अध्यक्ष विलास चौधरी, जीप सदस्य हर्षल पाटील, पी के महाजन, कृउबा सदस्य गोपाळ नेमाडे, वन कर्मचारी प्रशिक्षण केंद्र संचालक कृष्णा भवर, सहा वन संरक्षक वसंत पवार, रमाकांत भवर, सरपंच हजरा तडवी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ मिलिंद वायकोळे,अर्जुन जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. सुरवातीला वृक्ष पूजन करण्यात आली या नंतर केंद्राचे उदघाटन करण्यात आले. या ठिकाणी विक्री साठी ठेवण्यात आलेल्या वस्तू विकत घेण्याचा मोह मान्यवरांना आवरता आला नाही.
प्रास्ताविकात वन परिक्षेत्र अधिकारी राजेंद्र राणे यांनी वन धन खरेदी आणि विक्री धोरण स्पष्ट केले. यानंतर सुरेश धनके यांनी रावेर वन परीक्षेत्र मधील झालेल्या कामांचे कौतुक केले. नंदकिशोर महाजन यांनी म्हटले की लहानपणापासून पाल थंड हवेचे ठिकाण म्हणून मी ऐकत होतो मात्र मागील काही वर्षात या पर्यटन क्षेत्राने रंग बदलला असून खऱ्या अर्थाने पर्यटन स्थळ विकास होत असल्याचे सांगून अधिकारी यांचे कौतुक केले. श्री मोरणकर यांनी भविष्यात करावयाची विकासकामे बोलून दाखविली यात पाल मार्गदर्शिका, व्हिडीओ सीडी तयार करून पर्यटकांसाठी अधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. शेवटी आ हरिभाऊ जावळे यांनी मनोगतात म्हटले की, पाल गावाच्या विकासासाठी लागेल तेवढा निधी शासनाकडून उपलब्ध करवून देऊ. सातपुडा हरित झाल्यास पाण्याची देखील समस्या आपोआप दूर होतील. अनेक आदिवासी युवकांना गावातच रोजगार उपलब्ध होतील. आपल्या जंगलातीलमाल हा गावातच विक्री होऊन आपली उपजीविका भागविली जाईल. पर्यटन वाढीस लागावे म्हणून आवश्यक असलेल्या विकासकामांचा प्रस्ताव तयार करून दिल्यास वन मंत्री ना सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. सूत्र संचालन दीपक नगरे यांनी केले तर आभार सहा वन संरक्षक वसंत पवार यांनी मानले. यावेळी समिती अध्यक्ष जुम्मा तडवी, कामील शेख, संजय पवार, सूर्यभान पाटील,
सत्तार शेख, इतबार तडवी, शरीफ तडवी, परिसरातील अधिकारी व्ही एम पाटील, एम बी पाटील, श्री पवार, श्री म्हात्रे, श्री राऊत यांच्या सह मान्यवर उपस्थित होते