- पावसाळ्यातही ४१ गावे तहानलेलीच
- नेहमीच होतो मासांचे तुकडे असलेला गढूळ पाणी पुरवठा:१६ गावच्या नागरीकाचे आरोग्य धोक्यात
संजय उमक
मूर्तिजापूर - तालुक्यात लंघापुर ५७ गावे पाणी पुरवठा योजना कार्यान्वित असून यामध्ये करंजा तालुक्यातील गावांसह अनेक गावांचा पाणी पुरवठा खंडीत करण्यात आला असल्याने भरपासाळ्यातही या योजनेवर अवलंबून असलेली गावे तहानलेलीच असल्याने मोठा पाणी प्रश्न निर्माण झाला आहे.
तालुक्यात कार्यान्वित असलेल्या ५७ खेडी लंघापुर पाणी पुरवठा योजने अंतर्गत मूर्तिजापूरसह कारंजा तालुक्यातील ५७ गावे अवलंबून आहेत परंतु जीवन प्राधिकरणाच्या धोरणामुळेच मोठी पाणी टंचाई दोन्ही तालुक्यात निर्माण झाली आहे
देयके स्थगित असल्याने जीवन प्राधिकरण विभागाने ४१ गावांचा पाणी पुरवठा बंद केला आहे यामध्ये ४१ गावांचा समावेश आहे मूर्तिजापूर तालुक्यातील २१ गावांचा तर कारंजा तालुक्यातील ३ गावांचा अशा २४ गावांचा पाणी पुरवठा कायमस्वरूपी बंद केला आहे त्याच प्रमाणे देयके स्थगित असल्याने मूर्तिजापूर तालुक्यातील १६ आणि कारंजा तालुक्यातील एका गावचा पाणी पुरवठा बंद केला आहे एकंदरीत ४१ गावांमध्ये जीवन प्राधिकरण विभागानेच कृत्रिम पाणी टंचाई निर्माण केल्याने नागरीकांनी संताप व्यक्त केला आहे. या योजनेवर अवलंबून असलेल्या ५७ गावांपैकी १६ गावांनाच पाणी पुरवठा करण्यात येत असून तोही अनियमित असल्याने सदरची योजना फक्त सलाईनवरच सुरू असू भविष्यात कधीही बंद होऊ शकते.
सदर्हू योजनेवर असलेले गावांचे थकबाकीचे कारण दाखवून अख्ख्या गावचा पाणी पुरवठा बंद करण्यात आला पंरतु पाणी पुरवठा बंद केलेल्या गावातील काहीनी पुर्ण देयके भरलेली असून सुद्धा त्यांनाही याचा फटका बसला आहे नियमानुसार ज्यांच्याकडे देयके बाकी आहेत अशा लोकांचीच व्ययक्तीक नळ कनेक्शन बंद करायला पाहिजे होते परंतु तसे नकरता जीवन प्रश्नधिकरणने पुर्व सुचना न देता अख्ख्या गावचाच पाणीपुरवठा बंद केला असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
५७ गावांपैकी आता यायोजनेचा फक्त १६ गावांनाच पाणी पुरवठा होत असून भविष्यात याही गावांची देयके स्थगित राहीली तर ही करोडो रुपयांची पाणी पुरवठा योजना जीवन प्राधिकरणाच्या अकार्यक्षमतेमुळे सलाईनवर चालू असलेली ही योजना लवकरच बासनात गुंडाळल्या जाण्याची चिन्हे आहेत
- जलकुंभांची स्वच्छता नाही
सध्याच्या स्थितीत या योजने मार्फत १६ गावांना अनियमित गढूळ व मांसाचे तुकडे असलेला पाणी पुरवठा होत आहे प्रत्येक गावातील जलकुंभात (पाण्याची टाकी) प्रचंड प्रमाणात गाळ साचल्याने व पक्षी मरुन पडल्याने गढूळ व मांसाचे तुकडे असलेला पाणी पुरवठा होतो यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे गावालगत असलेल्या पाण्याच्या टाक्या कधीच स्वच्छ केल्या जात नाहीत जलशुद्धीकरणासाठी कुठल्याही प्रकारची उपाययोजना केली जात नाही खरं तर जलकुंभांची दोन महिन्यात एकदा स्वच्छता करून पाण्यात ब्लिचिंग पावडरचे मिश्रण करायला हवे परंतू असे कधीच होत नसल्याने नागरीकाच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
लाखो रुपये देयका पोटी स्थगित असल्याने १७ गावांचा पाणी पुरवठा तात्पुरता तर २४ कायमस्वरूपी बंद केला आहे. नागरिकांकडून सहकार्याची अपेक्षा आहे, पण पाहीजे तसे सहकार्य होत नसल्याने ४१ गावांचा पाणी पुरवठा बंद करावा लागला, तात्पुरता पाणी पुरवठा बंद केलेल्या गावातील लोकांनी देयके भरली तर पाणी पुरवठा पुर्ववत होऊ शकतो.एम. आर. बोबडेउपविभागीय अभियंता जीवन प्राधिकरण, मूर्तिजापूर
योजना चालू झाल्या नंतर एक वर्षाने लोकांना अव्वाच्या सव्वा देयके मिळाली त्यातही पाणी पुरवठा सुरळीत नव्हता महीन्यातून एक दोन वेळा पाणी यायचे पाणी पुरवठा सुरळीत नसल्याने त्यातही भरमसाठ देयके जीवन प्राधिकरणाने दिली येवढी मोठी रक्कम लोकांनी कशी भरायची खरे तर संबंधित विभागानेच पाणी पुरवठा कायमस्वरूपी बंद करुन कृत्रिम पाणी टंचाई निर्माण केली आहे.प्रणिता जगदीश मारोटकरसरपंच ग्रामपंचायत, कंझरा
या योजनेच्या मुख्य लाईवरुन आमच्या शाळेत पाणी पुरवठा केला जायचा आतापर्यंत मिळालेली सर्व देयके आम्ही भरलेली आहे, परंतु कुठलीही सुचना न देता जीवन प्रश्नधिकरणने पाणी पुरवठा बंद केल्याने दोनशे विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत संबंधित विभागाला लेखी निवेदन दिले आहे आज आमचे विद्यार्थी शाळेबाहेर रस्ता ओलांडत पाणी पिण्यासाठी जातात भविष्यात अनुचित प्रकार झाला तर याची जबाबदारी कोण घेईलआर. के. पाथोडेमुख्याध्यापक,
प्रा.मधुकरराव मेंढे विद्यालय, बोर्टा
गावात पाणी पुरवठा नियमीत होत नाही झालाच तर दुषित, गढूळ आणि मांसाची तुकडे असलेला पाणी पुरवठा होतो या संदर्भात वारंवार तक्रारी केल्या आहेत परंतु जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही. जेव्हा आम्ही जाम झालेली पाईप लाईन श्रमदानातून खोदून उघडी केली तेव्हा त्यात मेलेले कुजलेले पक्षी आढळले त्यामुळे आमच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.प्रविण डाहाकेनागरीक व सामाजिक कार्यकर्ते, सिरसो