- आष्टा (कासार)येथे रांगोळीच्या माध्यमातून सामाजिक संदेश
इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा तालुक्यातील आष्टा(कासार)येथील दत्त मंदिरामध्ये भारतीय संस्कृतीतील गुरू शिष्य परंपरेचे पावन पर्व असणारा गुरुपौर्णिमा महोत्सव आष्टा नगरीमध्ये मोठया उत्साहात व मंगलमय वातावरणात साजरी करण्यात आली.
पहाटे चार वाजता सद्गुरूच्या काकडरतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली.त्यानंतर सद्गुरू महिमा सांगणारा व गुरुचे जीवनातील महत्व सांगणाऱ्या श्री स्वामी समर्थ चरित्र सारमृत चे वाचन करण्यात आले.त्यानंतर गावातील मुख्य रस्त्यावरून समर्थ्यांच्या पालखीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.पालखी सोहळ्यात शालेय विध्यार्थ्यांचे समूह नृत्य व लेझीम हे उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते.
पालखी प्रदक्षिणा मध्ये गावातील वारकरी व महिला भाविक कलश घेऊन उपस्थित होते.गावातील पालखी मार्गांचे भाविकांनी रांगोळीच्या माध्यमातून सुशोभीकरण करून पालखीचे स्वागत केले.बेटी बचाव, पाणी वाचवा,झाडे लावा झाडे वाचवा असे सामाजिक संदेश देणाऱ्या रांगोळ्या लक्ष आकर्षून घेत होत्या.पालखी सोहळ्यानंतर अतिशय नियोजन पूर्वक महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.जवळपास गावातील व परिसरातील हजारो भाविकांनी महाप्रसाद घेतला. सायंकाळी सत्संग करण्यात आले.या महोत्सवाच्या निमित्ताने मंदिर परिसराचे आकर्षक पध्दतीने सुशोभीकरण करण्यात आले होते.या कार्यक्रमासाठी श्री दत्त मंडळ व स्वामी समर्थ सेवा मंडळाचे सर्व सदस्य व फुलचंद सूर्यवंशी, दत्ता सोमवंशी,राजेंद्र चौधरी,सुरेश बलसुरे,संभाजी चौधरी, सुभाष सोलापुरे,भवनसिंग जाधव,दत्तात्रय कागे, धोंडीराम पाटील,श्रीशैल तडकले,रामकृष्ण शिंदे यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.