इकबाल मुल्ला
लोहारा/ प्रतिनिधी :- सध्याच्या सरकारने तालुक्यातील शेतकऱ्यांना विमा रकमेपासून वंचित ठेवून शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे.त्यामुळे या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची शेतकऱ्यांनी एकत्र येऊन लढा द्यावा असे आवाहन राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा.सुरेश बिराजदार यांनी केले.
पिक कापणी प्रयोगा दरम्यान चुकीच्या पद्धतीचा अहवाल कर्मचाऱ्यांनी पाठवला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील लोहारा व उस्मानाबाद तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे.त्यामुळे या अन्याया विरुद्ध लोहारा तालुक्यातील सर्व गावांमध्ये दि.19 जुन रोजी शेतकऱ्यांची आमसभा आयोजित करून वंचित शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळावी याबाबत ठराव घेण्यात येणार आहेत.याबाबत ची माहिती देण्यासाठी लोहारा शहरात दि.17 जुन रोजी बैठक घेण्यात आली.या प्रसंगी ते बोलत होते.
या बैठकीस प्रमुख म्हणुन उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष प्रा.सुरेश बिराजदार,माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल पाटील,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिनकर जावळे पाटील,नगरसेवक आयुब अब्दुल शेख,विजय लोमटे,अमोल ओवंडकर,तानाजी आनंदगावकर, ज्ञानोबा जाधव,राष्ट्रवादी कॉग्रेस शहराध्यक्ष आयुब हबीब शेख,अदि उपस्थिती होते.
यावेळी पुढे बोलताना प्रा.सुरेश बिराजदार म्हणाले की,उस्मानाबाद जिल्ह्यातील सहा तालुक्यांना खरीप 2017 चा सोयाबीन पिकाचा विमा मिळाला.परंतु लोहारा व उस्मानाबाद तालुक्यातील शेतकऱ्यांना हा विमा मिळाला नाही.यामुळे या दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे.या अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन दि.17 जुन रोजी आपापल्या गावात शेतकऱ्यांची आमसभा घेऊन यामध्ये जिल्ह्यातील 75 हजार वंचित शेतकऱ्यांना विम्याची रक्कम देण्यात यावी अशी विनंती मुख्यमंत्री यांना या ठरावाद्वारे करण्यात यावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच या वंचित शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी माजी मंत्री आमदार राणा जगजितसिंह पाटील हे मुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करत आहेत.तसेच ही मागणी मान्य न झाल्यास दि.29 जून रोजी आ.राणा जगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली पीडित शेतकऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.या बैठकीत तालुक्यातील प्रत्येक गावातील आमसभेची जबाबदारी कार्यकर्त्यांना देण्यात आली. या बैठकीसाठी शब्बीर गवंडी,संतोष मुरटे,पप्पू सूर्यवंशी,हेमंत माळवदकर,प्रकाश भगत,मंगेश पाटील,दादा रनखांब, विजयकुमार क्षीरसागर,जयदिप थिटे,नरदेव कदम,संजय सूर्यवंशी,प्रशांत सोमवंशी, नागुरचे सरपंच गजेंद्र जावळे,बालाजी सूर्यवंशी, पांडुरंग पाटील,कल्लाप्पा गाडेकर,अजित सूर्यवंशी, हणमंत दनाने,अमोल पाटील,संभाजी मुसांडे,अरुण बोडके,अशोक पाटील,वामन भोरे,प्रशांत हाक्के, बालाजी मुळे,चंद्रकांत बेलकुंडे,बापूराव पवार, यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.