एस.टी. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशी वर्गात तारांबळ.


रिज़वान सिद्दीकी
मूर्तीजापुर  :- येथील एस.टी.कर्मचाऱ्यानी पगार वाढीसाठी संपूर्ण आगार बंद ठेवल्याने ग्रामीण भागातील प्रवाश्यांची एकाएक तारांबळ उडाली. आणि संध्याकाळ पर्यंत बसेस सुरू न झाल्यामुळें प्रवाश्यांना ताटकळत बसावे लागले.या संपात कामगार सेनेने सहभाग न घेतल्यामुळे त्या कर्मचाऱ्यांनी कामावर हजेरी लावून आपली कामगिरी बजावली.महाराष्ट्र राज्य एस.टी.कर्मचाऱ्यांनी आपल्या पगार वाढीसाठी दि.७ जूनच्या मध्य रात्री पासुन अघोषित संप सुरु केला आहे. त्यामुळे मूर्ती जापुर बसस्थानकावर ग्रामीण भागातील प्रवाश्यांची एकच गर्दी उसळली होती. मूर्तीजापुर आगारातील एकुण १३० कामगार संघटना चे कर्मचारी या संपात सहभागी झाल्याने संपूर्ण आगार बंद पडल्याने प्रवासी वर्गात ताराबळ उडाली होती. एकाएक बसेस बंद पडल्याने प्रवाश्यांची गैरसोय होवू नये म्हणून आरटीओ विभागाने खाजगी वाहनांना परमीट देवुन प्रवाश्यांची व्यवस्था केली. मूर्तीजापुर आगारातील कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे महामंडळ प्रशासनाचे एकाच दिवशी लाखो रूपयाचे नुकसान झाले खरी पण प्रवाश्याना ही ताटकळत बसण्याची वेळ आली.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post