भाऊ जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला जगायचे असते



भाऊ
जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला जगायचे असते
पण कसे जगायचे तेचं नेमके 
माहितं नसते
जगण्यासाठी तो धावत असतो
माणसांच्या गर्दीत आपलं सुख शोधत असतो
सुख मिळेलचं याची त्याला 
खात्री नसते
तरीही जगण्यासाठी त्याची धावपळ असते

भाऊ तुला सांगतो
या जगात ज्याचं चांगलं होतं
त्याचं चागंलं होऊ देत नाही
आणि झालचं तर त्याला आणखी पुढे जाऊ देत नाही
एखाद्या गरीबाने श्रीमंत होऊचं नये
असा श्रीमंताचा अजेंडा आहे
या जगात श्रीमंताचाच झेंडा आहे

बरका भाऊ
प्रत्येक माणूस वेगवेगळ्या विचारांचा असतो त्याच वागणं बोलनं संस्कार संस्कृतीत फरक असतो 
म्हणून आयुष्य म्हणजे नेमक काय रे भाऊ त्याला माहिती नही
माणूस आपलं जगण सोडत नही

अरे भाऊ 
माणसाच्या जगण्या वागण्यातं
फरक कसा असतो म्हणून तुला सांगतो
आता हेच बघना
गरीब माय बाप राब राब राबतात
मोल मजुरी करून पोराला शिकवतात
सोताच्या अंगावर फाटके कपडे घालून पोराचे लाड पुरवतात
मुलगा मांगेल ते बाप आणुन देतो
त्याची फिकीर मुलगा कधीचं करत नसतो
पोरगा मात्र सुटा बुटात कँलेजला जातो गाँगल घालुन फँशनं करतो
फाटकी तुटकी जिन्स घालुन
पोरगीला फिरवतो
आई बाप त्याच्या उज्वल भविष्याच स्वप्न बघतं असतात
*असेही माणस जगात असतातं*

*अरे भाऊ काय सांगु तुला*
श्रीमंताच्या पोराचं तस नसतं
पैशाच्या जोरावर तो जोर मारत असतो
दोनचार पंटर गोळा करून स्वताला भाऊ दादा आप्पा आन्ना
म्हणायला लावत असतो
खरतरं याला कोणी ओळखतही नाही तरी पण
चौका चौकातं बँनर लाऊन हा त्याचा वाढदिवस साजरा करतं असतो
पेलवंत नाही एव्हढ सोनं अंगावर
चढऊन सोताची श्रीमंती दाखवतं असतो
एकदोन समाजकार्य करुन राजकारणात त्याचा प्रवेश निश्चित करत असतो
पैशाच्या जोरावर तो निवडून येतो
निवडुन आल्यावर
फक्त पैसाचं कमवतं असतो
आई बाप अशा पोरावर भारी भरतात
*असेही माणस या जगात असतातं*

*तुला सांगु का भाऊ*
खेड्या गावाची सरं शहराला कधीच येणार नाही
खेड्यातला आपलेपणा शहरातं
दिसत नाही 
अरे खेड्यातला माणूसं माणुसकीने जगतं असतो
दुसऱ्याच दुःख तो आपलं समजतं असतो
अडी अडचणीला तो धाऊन येतो
कधी कधी पदरमोड खर्च करुन
आधार देत आसतो
दुसऱ्या घरचं लग्न तो आपलचं समजत असतो
पत्रीका वाटण्या पासुनंतर नवरीचं कन्यादान होईपर्यंत राबत असतो
मुलगी गाव सोडून जाते तेव्हा
माझीचं मुलगी माझीचं बहीण
सासरी निघाले म्हणून
गावातला प्रत्येक मायबाप भाऊ रडतं असतो
आसा भावबंध खेड्या गावातं जपुन ठेवतात
*असेही माणसे या जगात असतात*

*भाऊ तुला खरचं सांगतो*
शहरात मात्र अस नसतं
शेजारी कोण राहतो कुणाला काहिचं माहितं नसतं
सुख दुखाचं जाऊ द्या
कोणी कोणाला विचारतही नसतं
लग्नकार्याचं काय घेऊन बसलातं
रडायची कलकलं एकायला आल्यावरं कोणी गचकल्याचं तेव्हा त्याला कळतं
दार बंद करून जो तो 
आप आपल्या घरातं बसला असतो
मुरद्याला स्मशानभूमीत न्यायला
फक्त त्याचाचं परिवार असतो
कोणी पाव्हणा जरी गेला तरी 
कधी जाणार असा त्याचा पहिला प्रश्न असतो
रात्र कशीतरी काढून चहा न घेता
पाव्हणा आपल्या गावाकडची वाट धरतं असतो
आशा वेदना ते देहात साठऊनं ठेवतातं
*असेही माणसे या जगात असतातं*

*कळल का भाऊ*
जन्माला येणारी माणस आशी जगतात
कशी जगतात त्याचं त्याना कळतं नसते
तरीही जगण्यासाठी त्याची धावपळ असते
म्हणुन माणसाने माणसाला आपले समजुनचं जगायचे असते
न सांगता ह्रुदयात जागा करून द्यायची असते
ज्याचं कोणी नसते अशी माणसे
सर्वाना आपले समजतातं
असेही माणसे या जगात असतातं
  
कवि :- संजय धनगव्हाळ

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post