वडगांव गांजा येथे डॉ.बबाबासाहेब आंबेडकर जयंती व महात्मा फुले जयंती निमित्त व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न



इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- राष्ट्रपिता महात्मा ज्योतीबा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त व बर्टीचे महासंचालक कैलास कणसे साहेब(भा. प्र.से.) समतादूत प्रकल्पाच्या मुख्य संचालिका प्राज्ञाताई वाघमारे व जिल्हा प्रकल्प अधिकारी तुषार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात विविध सामाजिक कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.
दिनांक 11 एप्रिल रोजी लोहारा तालुक्यातील वडगाव गांजा येथे व्याख्यानाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बर्टीचे प्रकल्प अधिकारी तुषार कदम,समतादूत कुलदीप गायकवाड, रमेश नरवडे, गोविंद लोमटे,किरण चिंचोले,नागनाथ फुलसुंदर,सुहास वाघमारे,गणेश मोटे,अर्चना रणदिवे,शाहिदा सय्यद,अदि उपस्थित होते.


यावेळी कुलदीप गायकवाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर,राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले,छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार मांडले.पुढे बोलताना म्हणाले कि,तरुणांनी व्यसनापासून दूर रहावे, बार्टीमध्ये आम्हा तरुणांची निवड यासाठीच केली आहे,आम्ही बदलतो तर तुम्ही का नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सर्व महामानव एकाच जातीची शिकवण दिली ती म्हणजे मानवतेची.थोर महापुरुषांचे विचार आचरणात आणून समाजाचे ऋण फेडावे असे सांगीतले.यावेळी समतादूत किरण चिंचोले यांनी शेतकऱ्याचा आसूड याविषयी मार्गदर्शन केले,गुरु शिष्याचं नातं कसं असलं पाहिजे,महात्मा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे असावे,असे सांगीतले.
व तसेच समतादूत रमेश नरवडे यांनी विद्येची देवता सरस्वती नसून सावित्रीबाई फुले आहेत,किती शाळा काढल्या सरस्वतींनी,किती मुलींना शिकवलं? असा सवाल उपस्थित  केला.उलट सावित्रीबाई भारताच्या पहिल्या मुख्याध्यापिका,पहिल्या शिक्षिका, अविवाहित बलात्कारित मुलीच्या पोटी जन्मास आलेल्या मुलास दत्तक घेणाऱ्या,अंगावर शेन,माती, चिखल, दगड, प्रसंगी मारहाण सहन करून सर्वच मुलींना शिक्षण देणाऱ्या,आणि क्रांतीसुर्याची खंबीरपणे साथ देणाऱ्या एकमेव महान स्त्री आहेत असे सांगीतले.यावेळी समतादूत गोविंद लोमटे यांनी शेतकऱ्यांना आधुनिक शेतीविषयी माहिती दिली. कृषिच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती दिली.या कार्यक्रमाचे प्रस्ताविक तुषार कदम व सुत्रसंचालन समादुत नागेश फुलसुंदर यांनी केले तर आभार सरपंच बबन फुलसुंदर यांनी मानले.या कार्यक्रमास सरपंच, उपसरपंच,उपसरपंच,ग्रा.पं.सदस्य,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष,तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष,नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होतै.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post