प्रवीण वैष्णव
तेल्हारा :- जिल्हा परिषद शाळा ह्या उद्याचे सक्षम नागरिक घडवण्यात सक्षम आहेत .विद्यार्थ्यांनी उत्तम सवयीचा अंगीकार करावा असे उद्गार जिल्हा परिषद चे मुख्यकार्यकारी अधिकारी एस.रामामुर्ती ह्यांनी जिल्हा परिषद शाळा आकोली रूप येथे स्वच्छ सेना विद्यार्थी कौतुक सोहळ्यामध्ये काढले.
हगणदरीमुक्त अभियानात आकोली पर्टन म्हणून नावारुपाला आलेल्या आकोली गावात ए.एस.नाथन ह्यांनी स्वच्छता अभियान राबवून विद्यार्थी स्वच्छ सेना स्थापन केली. गाव हगणदरीमुक्त झाले. विद्यार्थ्यांनी केलेल्या परिश्रमाचे कौतुक करण्यासाठी एका कौतुक सोहळ्याचे आयोजन आले होते .सरपंच जनार्धन ढोकणे ह्यांच्या अध्यक्षतेत संपन्न सोहळ्याला मुख्य कार्यकारी अधिकारी एस रामामुर्ती,समाज सेवक ए.एस नाथन ,उपमुख्यकार्यकारी अधिकारी उल्हास मानकर, हिवरखेड चे ठाणेदार देवरे साहेब गटविकास अधिकारी राजीव फडके, सहाय्यक गटविकास अधिकारी हिवाळे साहेब ,पंचायत विस्तार अधिकारी सरोदे साहेब ,गटममन्वयक सहदेव चिकटे साहेब , विस्तार अधिकारी ठोंबरे साहेब ,स्वच्छता समन्वयक ऐश्वर्या मॅडम ,डांबरे सर , गजानन महल्ले, शाळा समिती अध्यक्षा सौ. सुनिता मिलिंद लहासे तंटामुक्त समिती अध्यक्ष भाणूदास लासूरकार केद्र प्रमुख अविनाश राऊत पोलिस पाटील ,विलास बुरघाटे उपस्थित होते. ह्या प्रसंगी स्वच्छ सेना सहभागी विद्यार्थी, समाज कार्यात अग्रेसर नागरिक तथा स्वच्छ सेना सहभागी गावातील शाळांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले.विद्यार्थ्यांचा हगणदरीमुक्त अभियानात सहभाग पाहता ग्रामपंचायत आकोली ह्यांनी शाळेला क्रीडांगणासाठी जागा उपलब्ध करून दिली. क्रिडांगणाचे उद्घाटन एस.रामामुर्ती ह्यांच्या हस्ते झाले तसेच सेवा निवृत्त केंद्र प्रमुख अविनाश राऊत ह्यांचा सत्कार संपन्न झाला . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक रामदास होपळ ,ग्राम विकास अधिकार आर.एस. थिटे ,जेष्ठ शिक्षक नागोराव खारोडे, अविनाश भारसाकळे, संघर्षकुमार सावरकर,पंजाब रौंदळे, मोहन भड, वंदना नाथे, सुनिता बारगीर ,विनायक बोदडे, विनोद मंजुळकार ह्यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक रामदास होपळ, संचालन अविनाश भारसाकळे यांनी तर आभार प्रदर्शन संघर्षकुमार सावरकर ह्यांनी केले.