![]() |
अकोला, दि. 28 - जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली लोकचळवळ बनलेल्या मोर्णा नदी स्वच्छता मोहिमेची आज स्वत: मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखली घेतली. आपल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून त्यांनी मोर्णा स्वच्छता मोहिमेचे कौतुक केले. एखादे चांगले काम करण्याचा ठाम निश्चिय केल्यास कुठलीही गोष्ट अशक्य नाही, या भावनेतूनच अकोल्याच्या लोकांनी एकजुटीने मोर्णा नदीची केलेली स्वच्छता प्रशंसनीय आहे, याबददल मी अकोल्याच्या जनतेचे, तेथील प्रशासनाचे अभिनंदन करतो, आपला हा उपक्रम देशातील इतर लोकांसाठी निश्चितपणे प्रेरणादायी ठरेल, या शब्दांत पंतप्रधानांनी मोर्णा स्वच्छता मोहिमेचे कौतुक केले. दूरदर्शन, आकाशवाणी आणि इतर प्रसार माध्यमांवरुन मा. पंतप्रधान यांचा ‘मन की बात’ हा कार्यक्रम प्रसारीत होत असतो. आज रविवारी प्रसारीत झालेल्या त्यांच्या या कार्यक्रमात मोर्णा नदी स्वच्छता मोहिमेचा उल्लेख आला.
![]() |
![]() |
‘मन की बात’ या कार्यक्रमात मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोर्णा स्वच्छता मोहिमेचे केलेल्या कौतुकाबाबत प्रतिक्रिया देताना जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी मोर्णा स्वच्छता मोहिमेच्या यशाचे श्रेय अकोलेकरांना दिले आहे. जिल्हाधिकारी म्हणाले की, मोर्णा स्वच्छता मोहिमेची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेऊन मोहिमेचे कौतुक केले आहे. या मोहिमेत सहभागी झाल्याबददल सर्व अकोलेकरांचे मी अभिनंदन करतो.
पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील, खासदार संजय धोत्रे, महापौर विजय अग्रवाल, आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, आमदार हरिष पिंपळे, यांच्यासह मोहिमेत सहभागी झालेले लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, पत्रकार, विदयार्थी, शासकीय अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, एनएनसीचे विदयार्थी, व्यापारी, पोलीस, महिला, वयोवृध्द नागरिकांनी मोहिमेत सहभाग घेतल्याबददल जिल्हाधिकाऱ्यांनी या सर्वांचे अभिनंदन करुन त्यांचे आभार मानले.


