![]() |
सैय्यद मुजीबोद्दीन
कळंब: दिनांक ३१ :- कळब तालुक्यातील मौजा आमला येथे दोन महिण्या पासुन पाण्याची भिषण टंचाही असुन यावर उपाय योजना करण्यात यावी या मागणीच्या संदर्भात यापुर्वी आमला ग्रामवासीनी गटंविकास अधिकारी प स कळंब यांना निवेदन सादर केले होते. या संदर्भात अजुन पर्यंत पाणी टंचाईच्या सदंर्भात प्रशासणा कङुन कोणत्याही प्रकारची उपाय योजना करण्यात आली नसल्यामुळे ग्रामवासीयांना पाण्या करीता भटकावे लागत आहे. मौजा आमला येथील पाणी टंचाईच्या सदंर्भात त्वरीत उपाय योजना करावि अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने येथील गटविकास अधिकारी प स कळंब यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
सदर मागणीच्या संदर्भात गांर्भीयाने दखल न घेतल्यास प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. सदर निवेदन देते वेळीस प्रहार जनशक्ती पक्ष कळंब तालुकाध्यक्ष राहुल बारसे, राष्ट्रीय क्रांतीकारी विचार महासंघाचे मुख्यसंयोजक रूस्तम शेख, रितेश थुल (तालुका सचिव प्रहार), गजानन मेश्राम प्रहार कार्यकर्ते, गोपाल बारसे प्रहार कार्यकर्ते, सुयश पाटील प्रहार कार्यकर्ते अदि पदाघिकारी उपस्थित होते.
