युवा मतदारानी लोकशाही सुदृढ करावी - जिल्हाधिकारी आस्त‍िक कुमार पाण्डेय


अकोला दि. 25-भारतीय लोकशाही ही मजबूत लोकशाही असुन येत्या काळात जागतीक स्पर्धेत टिकून राहावयाचे असेल तर भारतीय संविधानावर आधारीत लोकशाहीचे मुल्य जोपासून युवा मतदारांनी आपल्या देशाची लोकशाही सूदृढ करावी असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी आस्त‍िक कुमार पाण्डेय यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामुर्ती, उप निवडणूक अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, उपविभागीय अधिकारी संजय खडसे, शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, औद्योगीक प्रशिक्षण संस्था (मुलीचे) प्राचार्य श्री. भंडारे, कैलास ठाकरे यांची प्रूमुख उपस्थिती होती.जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, अनेक देशानी आपला विकास करतांना नैतीक मुल्यांना तिलांजली दिली, परंतू भारताने आपली लोकशाही टिकवून प्रगती केली आहे. हेच आपल्या देशाचे बळकट स्थान असल्याचे त्यांनी सांगीतले. मागील 70 वर्षात आपली लोकशाही प्रगल्भ झाली असून यासाठी आपल्या लोकप्रतिनिधीचे चांगले कार्य केले असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगीतले.लोकप्रतिनिधी शिक्षीत असो वा अशिक्षीत असो परंतू मतदार हा सुशिक्षीत असावा असे मत जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांण्डेय यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांना देश, लोकशाही, राजकीय पक्ष, संविधान व लोकशाही प्रणाली या शब्दांची व्याख्या शिक्षकांनी समजावून सांगावी, यासाठी शाळेत चर्चासत्राचे आयोजन करावे असे सांगुन जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, भावी मतदारांना Idea Of India समजावून सांगण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगीतले.मतदारांनी मतदान करतांना सर्व उमेदवारांचा योग्य अभ्यास करुन योग्य उमेदवारांना मतदान करावे असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामुर्ती यांनी सांगीतले. जागृत मतदार हा लोकशाही बळकट करतो असे सांगुन उपविभागीय अधिकारी संजय खडसे म्हणाले की, कल्याणकारी राष्ट्र बनविण्यासाठी लोकशाही मजबूत असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगीतले.कार्यक्रमाचे प्रास्ताविकातून राष्ट्रीय मतदार दिवसाचे महत्व उप निवडणूक अधिकारी राजेश खवले यांनी सांगीतले. मतदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे असे सांगुन कर्तव्य योग्यरीतीने बजावणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगीतले. मतदान नोंदणी करा, मतदान करा व नितिमुल्यावर आधारीत मतदान करा असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रकाश अंधारे यांनी केले. यावेळी मतदार जन जागृतीसाठी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील गुणवंतांचा गौरव प्रमाणपत्र देवून करण्यात आला. यात चित्रकला स्पर्धेत प्रथम निकीता राऊत, व्दितीय प्रांजली भोजेकर, तृतीय श्वेता काटोलकर यांचा, वादविवाद स्पर्धेत प्रभात किडसचा समिक्षाराजे खुमकर व सानिका जुमडे यांच्या तर व्दितीय डॉ.हेगडेवार विद्यालय व तृतीय भारत विद्यालयाच्या विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला. निबंध स्पर्धेत प्रथम प्राजक्ता देशमुख, व्दितीय तेजस्विनी वासतकर, तृतीय शुभम दामोधर यांचा गौरव करण्यात आला. रांगोळी स्पर्धेत विद्या घाटोळ, उमा गावंडे, प्रिती शिंदे यांचा गौरव करण्यात आला.सामान्य ज्ञान स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधीत्व करणारे वेदांत देशमुख व पवन बावने, आगर यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी मतदार जागृती रॅलीत दिव्यांगानी भाग घेतला त्यापैकी प्रतिनिधीक स्वरुपात संजय बरडे, श्रीकांत देशमुख या दिव्यांगाचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते घेण्यात आला. अन्वी मिर्झापूर येथील अक्षय गावंडे, अकोल्याचे प्रशांत वानखडे, चिखलगावचे अमोल गावंडे या सैनिकांचा सत्कार करण्यात आला. 
यावर्षी वयाचे 18 वर्ष पुर्ण झालेल्या सहस्त्रक नव मतदार अल्फीया फरदीन खान, तफझुल हुसेन खान, अर्शद अलीम खान, विश्वमित्र चित्ते, स्वागत इंगळे, स्नेहा त्रिपाठी, तुषार तायडे, सौरभ पागृत यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी काही मतदारांना मतदान ओळखपत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी पश्चिम व पुर्व मतदार संघात उत्कृष्ट काम करणा-या बि.एल.ओ. चा सत्कार करण्यात आला. वादविवाद स्पर्धेत गौरविण्यात आलेल्या गुणवंत विद्यार्थी समिक्षा खुमकर व सानिका जुमडे यांनी आपले विचार व्यक्त केले. एकुण 13 तास एकाग्रतेने मेहनत घेवून सुबक रांगोळी काढणा-या सौ. मोनिका अमित अनासने यांचा सत्कार जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी उपस्थितांनी राष्ट्रीय दिनानिमित्त शपथ घेतली. या कार्यक्रमाला विविध विद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक, मतदार, गुणवंत विद्यार्थी तसेच नागरिक उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post