मकसूद अली,
यवतमाल - विधिमंडळात बोन्डअळी ग्रस्त शेतकऱ्यांची शासनाने जाहीर केलेली हेक्टरी ३० हजार ते ३७ हजार ची मदत सरसकट व विनाविलंब देण्यात यावी या मागणीसाठी यवतमाळ जिल्हा शेतकरी संघर्ष समिती,काँग्रेस ,मनसे, राष्ट्रीय युवा संघटन,शेतकरी संघटना,शेतकरी वारकरी संघटना,बेंबला कालवे संघर्ष समिती यांनी पुकारलेल्या चक्री धरणे आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी शेतकऱ्यांनी आंदोलन स्थळी मुंडन करून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मूग गिळून बसलेल्या सरकार चा निषेध केला.आज आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदार संघाच्या शिवसेनेच्या खासदार भावनताई गवळी यांनी चक्री धरणे आंदोलनात शिवसेना पदाधिकाऱ्यांसह सक्रिय सहभाग घेतला.या प्रसंगी बोलताना त्यांनी शिवसेना सदैव शेतकरी आणि त्यांच्यासाठी लढणाऱ्यान सोबत राहली आहे.सरकारचे धोरण चुकीचे असून लोकसभेत आपण या विरोधात रान उठवू असा विश्वास शेतकऱ्यांना दिला.
स्थानिक तिरंगा चौकात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या चक्री धरणे आंदोलनाचा आजचा दिवस पुसद विधानसभा मतदार संघाचे होता.शेतकऱ्यांच्या प्रश्नावर असंवेदनशील असलेल्या फडणवीस सरकारच्या निषेधार्थ तब्बल शेतकऱ्यांनी डोक्यावरील केस कापून (मुंडन) कोडग्या सरकारचा निषेध केला .तसेच तरुण कीर्तनकार नंदकुमार माळवे यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा -वेदना बोलके करणारे भावपूर्ण कीर्तन सादर केले.उपस्थित शेतकऱ्यांनी आपल्या मनोगतातून सत्तारूढ सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांवर जबर प्रहार केले.गेल्या तीन दिवसांपासून ३२०० च्या वर न सरकलेले सोयाबीन चे दर ,दरवर्षी होणारा तूर खरेदीचा सावळा गोंधळ ,या वर्षी खुल्या बाजारात ३५०० ते ४००० च्या घरात असलेले तुरीचे दर आणि अद्यापही सुरू न झालेली तुरीची खरेदी केंद्रे या सर्व पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांमधील अस्वस्थता प्रकट केली.आजच्या या धरणे आंदोलनात डॉ.वजहात मिर्झा ,डॉ.मो.नदीम,अशोक बोबडे,प्रवीण देशमुख,अरुण राऊत,अजय पुरोहित,मनसेचे अनिल हमदापुरे,सुधीर जवाडे,माधुरी अराठे,,दिनेश गोगरकर,शिवसेनेचे राजेंद्र गायकवाड,प्रविण पांडे,गजानन डोमाळे, किशोर इंगळे,जक्की अन्वर,ईर्त्याकभाई,किशोर राठोड,मनमोहनसिंग चव्हाण,प्रभाकर उईके,जियाभाई,सुभाष राठोड,पंडितराव देशमुख,बळीराम चव्हाण,बाळू पाटील दरने, नईम इजारदार, गोपाल राठोड,अमजद बिल्डर,नाने खान.तसेच या प्रसंगी मुंडन करणारे शेतकरी शेख चाँद,समीर शेख रमजान,बळीराम चव्हाण,गजानन चव्हाण,तुकाराम हटकर,अब्दुल सलाम अब्दुल सत्तार,उत्तम पवार,जयश्री देसाई,वीणा नागदिवे,ममता मिश्रा,सुनीता पाटीलखेडे,मनीषा मेसेकर,शुभांगी गलांडे यासह मतदार संघातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.