नागरिकत्व संशोधन कायदा संपूर्ण देशवाशीयांची अवहेलना करणारा - मौलाना नदीम सिद्दिकी


मुर्तिजापूर :-  संपूर्ण देशात एन.आर.सी. व सि.ए.ए. बिल संदर्भात नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून सदरचा कायदा हा हिंदुस्थानातील सर्वच नागरिकांची अवहेलना करणारा असल्याचे प्रतिपादन जमियत उलेमा- ए- हिंद चे प्रदेशाध्यक्ष मौलाना नदीम सिद्दिकी यांनी केले.


याकरिता आम्हाला शांततेच्या मार्गाने आणि संयमाने सर्व जाती-धर्मातील बांधवांंसह मिळून ही लढाई लढायची आहे. जमियात उलेमा-ए- हिंद शाखा मूर्तिजापूर च्या वतीने नागरिकत्व संशोधन कायद्याच्या संदर्भात समाज प्रबोधन व मार्गदर्शन पर सभेचे आयोजन जुन्या शहरातील घरकुल परिसरात असलेल्या पटांगणात करण्यात आले होते.एन.आर.सी.हा मुद्दा नवीन नाही.


मागील अनेक वर्षापासून या कायद्याचा विरोध होत आलेला आहे.शासनाचे म्हणण्यानुसार भारतात एक कोटी ८० लाख घुसखोर आहे.त्यामध्ये अशा खोट्या तरतुदीच्या म्हणण्यावर विश्वास नसून जमियत देशाच्या संविधानाला वाचविण्यासाठी मागील अनेक वर्षापासून लढा देत आहे.आसामसह देशात सदर कायदा लागू करण्यात येणार असून हा  कायदा फक्त मुसलमानांविरुद्ध नसून सर्वच घटकांच्या विरुद्ध आहे.जमियत उलेमा-ए- हिंद नेहमी देश विभाजन करणाऱ्या कायद्याविषयी लढा देत आलेली आहे आणि लढा देत राहिल. 


जमियत उलेमाद्वारा यापुढे जेलभरो आंदोलन करण्याचे ठरले आहे.याबाबत लवकरच निर्णय घेतल्या जाईल असे त्यांनी पुढे बोलतांना सांगीतले.यावेळी व्यासपीठावर मौलाना अब्दुल सलाम,मुफ्ती वसिउल्ला, विदर्भ सचिव मुफ्ती रोशन कासमी, दारुल उलूम देवबंद चे मुबल्लीक मौलाना इरफान यासह इतर  मौलाना व मुक्ती यांची उपस्थिती होती.


 या सभेमध्ये मौलाना अब्दुल सलाम,मौलाना वसिउल्ला,मुफ्ती रोशन कासमी, दारुल उलूम देवबंदचे मौलाना मुबल्लीक इरफान यांनी मुस्लीम समाजाचे पवित्र ग्रंथ कुराण मधील विविध आणि आयतींचे विश्लेषण करून सामाजिक न्याय,बंधुता समतेचा संदेश दिला. तसेच कोणत्याही प्रकारचा द्वेष तिरस्कार कटुता निर्माण होणार नाही याबाबत सर्वांनी दक्ष राहावे असा सल्ला दिला.हा आमचा देश असून या देशाप्रती आम्हाला प्रेम आहे असे यावेळी सांगीतले.

           या कार्यक्रमाचे संचालन मुफ्ती उमेद यांनी केले.तर आभार प्रदर्शन जमियात उलेमा-ए--हिंदी चे तालुकाध्यक्ष मौलाना सदरोद्दिन यांनी केले.यावेळी मोठ्या संख्येने तालुक्यातील मुस्लिम बांधवांसह ईतर समाज बांधवांची उपस्थिती होती.

अत्यंत शांततेत हा कार्यक्रम पार पडला. सदर सभा पार पाडण्याकरता समाजातील सर्वच घटकांसोबत युवा वर्ग आणि स्वयंसेवक यांनी आपापली जबाबदारी पार पाडत अतिशय शिस्तीत ही सभा घेतली. यावेळी ठाणेदार आव्हाळे यांनी पोलिस बंदोबस्त चोख ठेवला होता.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post