समाज विकास संस्थेचे सामाजिक कार्यकर्ता गौरव पुरस्कार जाहीर


 इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- उमरगा येथील समाज विकास संस्थेच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाचे मधुकर धस स्मृती गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आलेले असून हा सत्कार व सन्मान सोहळा दि.15 जून 2018 रोजी सकाळी अकरा वाजता वात्सल्य बालगृहांच्या बाराव्या वर्धापन दिनानिमित्ताने उमरगा येथे पुरस्कार देऊन  कार्यकर्त्यांना गौरविण्यात येणार आहे.
ज्यांनी पंधरा ते वीस वर्षे विविध कार्यांमध्ये नावलौकिक मिळविला असे सामाजिक कार्यकर्ते सज्जी मान जोसेफ निर्माता वात्सल्य बालगृह व  इक्बाल मुल्ला(लोहारा)पत्रकार दैनिक भास्कर,युसूफ मुल्ला मायक्रो कॉम कॉम्प्युटर उमरगा,सुहास धस दिलासा संस्था यवतमाळ,महादेव जोगदंड जनविकास  सामाजिक संस्था केज,विलास गोडगे पर्याय संस्था कळंब,महावीर डोके पिंपल्स डेव्हलपमेंट फाऊंडेशन,  सारिका लोंढे वात्सल्य बालगृह,या मान्यवरांना शाल श्रीफळ सन्मानपत्र मानचिन्ह व रोख एक हजार रुपये देऊन जिल्ह्याचे खासदार प्रा.रवींद्र गायकवाड,अनिल शिदोरे महासचिव मनसे मुंबई,विश्वनाथ तोडकर औरंगाबाद,डॉक्टर अशोक मोहेकर कळंब,डॉक्टर भारत खराटे कोल्हापूर,डॉक्टर दिलीप गरुड उमरगा, पत्रकार मारुती कदम उमरगा,पत्रकार अविनाश काळे उमरगा,रमेश भिसे केज,श्रीमती विजया यवतमाळ, विजया वाघ उमरगा,रामभाऊ लगाडे वाशी,अदिंच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे कार्यवाह भूमिपुत्र वाघ यांनी दिली आहे.तसेच
जिल्ह्याचे खासदार प्रा.रवींद्रजी गायकवाड सर व अनाथांची आई उषाताई गायकवाड यांच्या जाहीर सत्काराचे आयोजन
या निमित्ताने उस्मानाबाद जिल्ह्याचे खासदार प्रा. रवींद्रजी गायकवाड सर व उषाताई गायकवाड यांनी गेली वर्षभर वात्सल्य बालगृहातील अनाथ मुलांना अन्नधान्याचा पुरवठा करून त्यांनी अनाथाची आई वडील होण्याचा मान मिळविला आहे.या निमित्ताने या दोघांचा या कार्यक्रमात जाहीर सत्कार करण्यात येणार आहे.व या कार्यक्रमात भूमिपुत्र वाघ यांच्या वाटसरू या आत्मकथेचे प्रकाशन
भूमिपुत्र वाघ यांनी गेली तीस वर्षे सामाजिक कार्यात दिलेले योगदान त्यांनी केलेले कार्य त्यांनी अनुभवलेले जीवनातील चढ उतार याचे बोलके अनुभव आपल्या वाटसरू या आत्मकथेत मांडले आहेत.या वाटसरु आत्म कथेचे प्रकाशन कवी बालाजी इंगळे व खा.प्रा. रवींद्र गायकवाड यांच्या हस्ते होणार आहे.
या कार्यक्रमाला जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते शिक्षक प्राध्यापक बचत गटातील महिला ग्राम सावित्री ग्राम जोतिबा विविध गावातील सरपंच उपसरपंच उपस्थित राहणार असल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली आहे.या कार्यक्रमाला जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहण्याची विनंती अजित  कांकरिया,निखील वाघ,आनंद वाघमारे,अलका गुरव, ज्योती राजपूत,आशा गुरव,विद्या मारकड,हरिश्चंद्र ढाकणे,संतोष मोरे,शालिनी पाटील,विठ्ठल ओव्हाळ यांनी केले आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post