नाफेडेकडे अडकलेले तुर व हरभऱ्याचे पैसे लवकर द्यावे,शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी

जाहिरात

इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी
नाफेडेकडे अडकलेले तुर व हरभऱ्याचे लोहारा तालुकायातील शेतकऱ्यांचे पैसे लवकर देण्यात यावेत,अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांच्याकडे  निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे कि,लोहारा शहरात शासनाच्यावतीने खरेदी केलेल्या दि.28/3/018 पासुन हरभरा खरेदी केला व त्यापुर्वी खरेदी केलेल्या तुरीचे बिल आजतगायत शेतकऱ्यांना मिळालेले नाही.
आता शेतीच्या मशागतीची व पेरणीचा शिजन जवळ आलेला आहे.तरी शेतकऱ्याच्या मालाची बिले ही माल खरेदी केल्यापासुन एक महिन्यात द्यायला पाहिजे होते.पण शेतकऱ्यांना त्याच्या मालाची मुद्दल रक्कमच दोन — तीन महिने शासनाकडे राहीली तर शेतकऱ्याने पुढील कामे कशी करुन घ्यायची व प्रत्येक वेळेस शैतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या पैशाची मागणी करावी लागते.हि का चांगली गोष्ट नाही.ह्याच पैशातुन शेतकऱ्यांना आता पुढील पेरणीसाठी बी— बियाणे,
जाहिरात
खते व इतर खर्च करावा लागतो.शेतकऱ्यांच्या मालाचे पैसे लवकर द्यावेत असा नियम असताना सुध्दा नाफेड मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहे.
तरी जिल्हाधिकारी यांनी लक्ष देवुन फेडरेशन मार्फत नाफेडने घेतलेल्या मालाचे पैसे शेतकऱ्यांना लवकर देण्यात यावीत,अशी मागणी निवेदनात केली आहे.
या निवेदनावर शेतकरी आयनोद्दीन सवार,नगरसेवक श्रीनिवास माळी,अजय माळी,अमोल माळी,सरपंच नागनाथ पाटील(सय्यद हिप्परगा),मारुती कार्ले
(वि.पांढरी),अदिंच्या सह्या आहेत.
जाहिरात

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post