लोहारा तालुक्यातील जेवळी येथे अचानक लागलेल्या भीषण आगीत घरच्या परिसरात रचलेल्या चार कडब्याच्या गंजी,दोन गोटे,शेती व संसार उपयोगी साहित्य जळून जवळपास दोन लाखाचे नुकसान झाले आहे



इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा तालुक्यातील जेवळी येथे अचानक लागलेल्या भीषण आगीत घरच्या परिसरात रचलेल्या चार कडब्याच्या गंजी,दोन गोटे,शेती व संसार उपयोगी साहित्य जळून जवळपास दोन लाखाचे नुकसान झाले आहे.तीन अग्निशामक बंबाच्या सहाय्याने अडीच तासा नंतर ही आग अटोक्यात आली.या घटने नंतर नायब तहसीलदार रणजीत शिराळकर व तलाठी जगदिश लांडगे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. उन्हाचा कडाका वाढत असतानाच ठिक ठिकाणी अगीच्या घटनेतही वाढ होत आहे.जेवळी येथील माळी गल्लीत पुनर्वसित घरांच्या खुल्या क्लस्टरमध्ये (परिसरात) रचण्यात आलेल्या बाबुराव माळी यांच्या कडब्याच्या गंजीला अचानक आग लागली.हि आगीणे बघता बघता भीषण रुप धारण केल्याने या आगीत बाबुराव माळी,सुधाकर माळी, रघुनाथ माळी व काशिनाथ माळी यांचा कडब्याच्या गंजी एकूच जवळपास दहा हजार कडबा तसेच दोन गोटे,एक घरचा शेड जळून खाक झाला.यात दोन बैल गाड्या,टिंबक संच,कपडे,धान्यासह शेती व संसार उपयोगी साहित्य जळून जवळपास दोन लाखाचे नुकसान झाले आहे.आग लागताच गावातील नागरिक मोठ्या संख्येनी एकत्र येऊन आग विजविण्याचा प्रयत्न केला.परंतु वाऱ्याने ही आग मोठ्या प्रमाणात पसरली.आग आटोक्यात येत नसल्याने गाव पुढाऱियांनी या घटनेची माहिती पोलीस व तहसील प्रशासनाला दिली.या नंतर तहसीलदार शोभा पूजारी, पोलीस निरीक्षक सर्जेराव भंडारे यांनी आपली यंत्रणा तात्काळ पाठविली.व उमरगा,नळदुर्ग व लोहारा येथील लोकमंगलचे अग्निशामक बंबाला पाचारण केले.या सर्वाच्या प्रयत्नाने अडीच तासाने ही आग अटोक्यात आली.यावेळी मोठ्या प्रमाणात आगीच ज्वाला बाहेर पडत असल्याने येथे कांही काळ भितीचे वातावरण तयार झाले होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post