पक्षाने जबाबदारी दिल्यास लोकसभा निवडणूक लढविणार भाजप प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकुर यांची सिंहगर्जना — जिल्हा भाजप मिडिया विभागाच्या बैठकीत घोषणा राजकीय धुरीणांच्या भुवया उंचावल्या



इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टीचा मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे़.आजपर्यंत पक्षाने दिलेली जबाबदारी आदेश मानून काम करीत राहिलो़.पक्षाकडे मि कधीच कांही मागितले नाही़ परंतू पक्षाने बोलावून घेवून आमदारकी बहाल केली़.युवा मोर्चा अध्यक्ष,प्रदेश सरचिटणीस केले़ सर्वसामान्य कार्यकत्र्याला मोठं करण्याचे काम भाजप पक्षात होते़.त्यामुळे पक्षोन लोकसभा लढविण्याचे आदेश दिल्यास लोकसभा निवडणुकही लढविणार असल्याची घोषणा भाजपाचे प्रदेश सरचिटणीस,आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी केली. आ़ ठाकूर यांच्या या घोषणेमुळे मात्र राजकीय धुरीणांच्या भुवया उंचावल्याचे म्हटले जात आहे़.
उस्मानाबाद येथे भारतीय जनता पार्टी मीडिया विभागाची जिल्हा बैठक दि.30 मार्च रोजी मुंबई येथील महाभाजप-महामेळावा तयारी संदर्भात घेण्यात आली़.या बैठकीस मार्गदर्शन करताना आ़.सुजितसिंह ठाकूर यांनी लोकसभा लढविणार असल्याचे वक्तव्य केले़.यावेळी बैठकीत एसपी शुगरचे चेअरमन सुरेश पाटील म्हणाले कि,मि राष्ट्रवादी,शिवसेनेसह काँग्रेस पक्षात काम केले़ मात्र इतर पक्षापेक्षा भाजपात काम करणाऱ्या नेत्यालाच नव्हे तर कार्यकत्र्यालाही सन्मानाची आणि आपलुकीची वागणूक मिळते़.व आ़ सुजितसिंह ठाकूर यांच्या सारखे नेतृत्व जिल्ह्यास लाभले आहे़ अगदी तळागळातील लोकांच्या अडी-अडचणी सोडविण्याचे काम आ़.ठाकूर करीत आहेत़. जिल्ह्यात भाजपा पक्ष वाढविण्याचे काम त्यांनी केले आहे़.त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत आ़. ठाकूर यांनी लोकसभा निवडणुक लढविल्यास निश्चितच 'कमळ' फुलल्याशिवाय राहणार नाही़ सेनेत नेतेमंडळी एकमेकाचेच पाय ओढताना दिसत आहेत़ राष्ट्रवादी आणि काँग्रेसचीही अवस्था अत्यंत वाईट आहे़.त्यामुळे या जिल्ह्यात आता भाजपा आणि आ़ ठाकूर यांच्याशिवाय पर्याय उरलेला नाही़.त्यामुळे आ़ ठाकूर यांनी लोकसभा निवडणूक लढवावी,असे आवाहन पाटील यांनी केले़.त्यानंतर बोलताना आ़.सुजितसिंह ठाकूर म्हणाले,माझ्या सारख्या कार्यकत्र्याला,घरात कुठला राजकीय वारसा  नसतानाही पक्षाने आमदार आणि प्रदेश सरचिटणीस केले़ पक्षाने जो आदेश दिला तो अगदी मनापासून पाळून काम करत गेलो़.अनेक राज्यात निवडणुकीत महत्त्वाची जबाबदारी पक्षाने माझ्या खांद्यावर टाकली़ ती यशस्वीपणे पेलली़.जर पक्षाने उस्मानाबाद लोकसभा निवडणूक लढविण्याचे आदेश दिले तर निवडणूकही लढवू,असे प्रतिपादन आ़.सुजितसिंह ठाकूर यांनी केले़.तसेच निवडणूक लढविण्याची क्षमता असणारे अनेक जण पक्षात आहेत़.शिवाय अनेक जण येणार आहेत़ त्यामुळे उमदेवारांची काही कमी नाही़ येणारी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपाचे 'कमळ'च फुलणार आहे़ त्यामुळे अजिबात चिंता करायची गरज नाही, जनतेत भाजपाची लोकप्रियता कमी झाली नसून ती वाढल्याचेही आ़.ठाकूर यांनी सांगीतले.यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी,भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुधीर पाटील,ॲड़.अनिल काळे, रूपामाता उद्योग समूहाचे अध्यक्ष ॲड़.व्यंकटराव गुंड,एसपी शुगरचे चेअरमन सुरेश पाटील,वसंतदादा बँकेचे चेअरमन विजय दंडनाईक,ॲड़.नितीन भोसले,
भाजप मिडिया विभाग जिल्हा अध्यक्ष धनंजय रणदिवे,जि.प.सदस्य ज्ञानदेव राजगुरू,मिडिया विभाग सरचिटणीस मिलिंद कुलकर्णी,जीवन गायकवाड, हेमंत कुलकर्णी,पार्श्वनाथ बाळापुरे,राहुल कोरे,मिडिया विभाग उपाध्यक्ष ओंकार कुलकर्णी,भगवान बांगर, संजय खुरूद,दत्ता गायके,चिटणीस अनंत तापडीय, नागेश इंगळे,कोषाध्यक्ष हेमंत कुलकर्णी,मिडिया विभाग तालुकाध्यक्ष सुभाष कदम (उस्मानाबाद) , मिडिया विभाग तालुका अध्यक्ष इक्बाल मुल्ला (लोहारा),यांच्यासह भाजप मिडिया विभाग जिल्ह्यातील पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते़.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजप मिडिया विभाग जिल्हाध्यक्ष धनंजय रणदिवे यांनी केले तर आभार प्रसिध्दीप्रमुख पांडूरंग(अण्णा) पवार यांनी मानले़.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post