धर्मवीर संभाजी महाराजांचे बलिदान विसरता येणार नाही - रामभाऊ फाटकर



तेल्हारा दि: धर्मवीर संभाजी महाराजांच्या बलिदानातून आणि हौतात्म्यातून मराठी राज्य बचावले हे मराठी मनाच्या बांधवांना कधीच विसरता येणार नाही असे प्रतिपादन धर्मवीर संभाजी महाराज क्रीडा व शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रामभाऊ फाटकर यांनी 17 मार्चला धर्मवीर संभाजीराजे यांच्या बलिदान दिना निमित्य आयोजित कार्यक्रमात केले  .                 धर्मवीर  छत्रपती संभाजी महाराजांचा  औरंगजेबा कडून अतोनात छेड करण्यात आला त्यांना अनेक यातना देण्यात आल्या  तरी सुद्धा संभाजीराजे औरंगजेबा पुढे झुकले नाहीत दूरदृष्टी ठेऊन संभाजी महाराजांनी बलिदान दिले परंतु धर्म सोडला नाही हा इतिहास आहे  संभाजी महाराज्यांन बद्दलचा खरा इतिहास जनते समोर यायला हवा असे रामभाऊ फाटकर यांनी आपले विचार व्यक्त करतांना सांगितले यावेळी शिव व्याख्याते सचिन था टे यांनी संभाजी महाराजांचे बलिदान व त्या नंतर मराठ्यांची झालेली एकजूट यावर सविस्तर मार्गदर्शन केले उपस्थित संभाजी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी धर्मवीर संभाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर विनम्र अभिवादन करून श्रद्धांजली अर्पण केली यावेळी धर्मवीर संभाजी मंडळाचे श्रीराम सुरे विठ्ठल बनकर अमर ठाकूर गणेश लासुरकार स्वप्नील सुरे विठ्ठल मामनकार आकाश फाटकर अक्षय सुरे श्याम खारोडे निलेश निवाने नितीन मानकर शुभम टिकार सागर जउळ कार  बाळूभाऊ मानकर महेश ठाकरे बालू हागे राजेश मामनकार राहुल झापर्डे गोपी घोडेस्वार  सोनू गाडगे मनोहर फाटकर अंकुश झापर्डे अमित घोडेस्वार खिलेश सायानी पवन झापर्डे इत्यादी संभाजी मंडळाचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post