रिज़वान
मुर्तिजापूर - येथील साहित्य क्षेत्रात विविध साहित्योपयोगी व समाजपयोगी उपक्रम व कार्यक्रम राबविण्यात आघाडीवर असलेल्या,सृजन साहित्य संघाव्दारे तिसरे एक दिवसीय साहित्य संमेलन आयोजित केले आहे. सृजन साहित्य संघाव्दारा या आधी,डॉ. विठ्ठल वाघ यांच्या अध्यक्षतेखाली पहीले व डॉ. गोपाल उपाध्ये यांच्या अध्यक्षतेखाली दुसरे साहित्य संमेलन आयोजित करण्यात अाले होते. या तिसऱ्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष,अमरावती येथील ज्येष्ठ साहित्यीक मा. बबन सराडकर हे असून उद्घाटक महाराष्ट्र टाईम्सचे,नागपूर येथील संपादक मा. श्रीपाद अपराजीत हे आहेत तर स्वागताध्यक्ष तरुण समाजसेवक मा.धीरज अग्रवाल मुर्तिजापूर हे राहणार आहेत.समाजातील तरुण,प्रौढ,मध्यमवर्ग,शोषीत तसेच शेतकरी व शालेय विदयार्थ्यांच्या जगण्याचे सजग भान साहित्यात प्रतिबिंबीत होऊन त्यावर विचार मंथन व्हावे हा निर्मळ दृष्टीकोन या साहित्य संमेलनाच्या आयोजनामागे आहे.या एक दिवसीय साहित्य संमेलनात ग्रंथदिंडी,संमेलनाचे उद्घाटन,पुरस्कार वितरण,पुस्तक प्रकाशन,मुलाखात,परिसंवाद,घडीभर बसा व खदखद हसा हा हास्यकार्यक्रम,गझल मुशायरा,कविसंमेलन व समारोप असा भरगच्च कार्यक्रम आयोजित केला आहे .मुर्तिजापूर येथील रसिकांनी या साहित्य पर्वणीचा आस्वाद घ्यावा असे आवाहन सृजन साहित्य संघाचे,रवींद्र जवादे,संदीप वाकोडे,प्रमोद पंत,विलास वानखडे,शैलेश गिरी,मिलिंद इंगळे,रामकृष्ण आसरे,बाळू बेलखेडे,विनोद गणेशपूरे,प्रा. प्रमोद राजंदेकर,प्रा. प्रशांत पंत,किशोर आष्टीकर,सुनिल वानखडे सौ. मीना जवादे,सौ. योगिता वानखडे,सौ. निलीमा आष्टीकर इत्यादींनी केले आहे.