- घाबरू नका, काळजी घ्या - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर
अकोला : कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी आवश्यक उपाययोजना म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात 21 दिवसाचा कर्फ्यू जाहीर केला आहे. _या काळात सर्व जीवनावश्यक सेवा सुरळीत सुरू राहतील. घाबरू नये, दक्षता घ्यावी, असे जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी स्पष्ट केले आहे .
राज्यात लागू असलेल्या कलम 144 च्या अधिसूचनेत नमूद केलेल्या बाबी तशाच सुरु राहतील. 21 दिवसाच्या कर्फ्यूमुळे जीवनावश्यक बाबींच्या पुरवठ्यावर , जीवनावश्यक सेवांवर कोणताही परिणाम होणार नाही.याबाबत सर्व जनतेला आश्वस्त करण्यात येत असल्याचे जिल्हा प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
त्यामुळे कृपया कोणीही पॅनिक होऊ नये. सर्व आवश्यक खबरदारी घ्यावी .घरातच राहावे .घराबाहेर कृपया पडू नये . _कोरोनाबरोबर आपली ही अत्यंत महत्त्वाची लढाई सुरू असून सर्व जनतेने संयमाने या परिस्थितीत सहकार्य द्यावे,_ असे आवाहन सर्वांना करण्यात आले आहे.