फेसबुकवर भारतीयांची माहिती चोरीला? CBIने विचारला जाब


वृत्तसंस्था, नवी दिल्ली :- फेसबुक, केम्ब्रिज अॅनालिटिका आणि ग्लोबल सायन्स रिसर्च या कंपन्यांना सोशल नेटवर्किंग साइट्सवरून भारतीयांची वैयक्तिक माहिती अवैधरीत्या चोरली जात असल्याबद्दल केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) जाब विचारला आहे, असे सूत्रांकडून समजले.

सीबीआयने या कंपन्यांना पत्र लिहिले असून, माहिती जमविण्यासंबंधीचे तपशील मागविले आहेत. केंद्र सरकारच्या परवानगीनंतर सीबीआयने गेल्या महिन्यापासून केम्ब्रिज अॅनालिटिका आणि ग्लोबल सायन्स रिसर्च या कंपन्यांची प्राथमिक चौकशी सुरू केली आहे. केम्ब्रिज अॅनालिटिका या कंपनीने आपल्याला ग्लोबल सायन्स रिसर्च कंपनीकडून माहिती मिळाली होती, असा दावा केला. ग्लोबल सायन्सने ही माहिती फेसबुककडून मिळवली असल्याचे निष्पन्न झाले आहे. भारतात फेसबुकचे २० कोटींपेक्षाही अधिक वापरकर्ते आहेत.
दरम्यान, फेसबुककडून माहिती मिळविल्याच्या दाव्यात कितपत तथ्य आहे, हे तपासण्यासाठी प्राथमिक चौकशी हे पहिले पाऊल ठरू शकते. त्यानंतर या प्रकरणाची एफआयआर दाखल करून चौकशी करावी की न करावी, याचा निर्णय घेतला जाईल.

अमेरिकेच्या २०१६मध्ये झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयासाठी फेसबुकवरील सुमारे आठ कोटी ७० लाख वापरकर्त्यांच्या माहितीचा उपयोग केल्याचा आरोप केम्ब्रिज अॅनालिटिकावर यापूर्वी करण्यात आला होता. फेसबुकचा संस्थापक मार्क झकेरबर्ग याने माहितीचा गैरवापर झाल्याचे संकेत दिले होते

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post