उमरखेड :- सकल मराठा समाज बांधवांनी विविध मागण्यासाठी उमरखेड तहसिल कार्यालया समोर १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट पर्यंत निरतंर आंदोलनाला सुरुवात केली आहे
सकाळ पासुन निरतंर आंदोलन स्थळी प्रख्यात गोंधळी कार अंबादास कदम ( गोंधळी ) यांच्या संचाने गोंधळ कार्यक्रम संपन्न झाला या आंदोलनात मराठा समाजाला तात्काळ आरक्षण लागु करावे , विद्यार्थासाठी जिल्हा व तालुका स्तरावर स्वतंत्र वस्तीगृह उभारण्यात यावे , मोर्चा दरम्याण युवकांवर लावण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावे , अॅक्ट्रोसिटी कायदयाचा दुरुपयोग होणार नाही या करिता दुरुस्ती करण्यात यावी , अरबी समुद्रातील शिवस्मारक तातडीने पूर्ण करावे , स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागु करण्यात याव्यात या सह विविध मागण्या समोर केल्या आहेत
तसेच स्वातंत्र्य दिनी मुंडण आंदोलन करून मुडंण केलेले केस मुख्यमंत्र्यांना पाठविन्यात येणार असल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे आंदोलनात न प उपाध्यक्ष अरविंद भोयर , गुणवंत सुर्यवंशी , शिवाजी माने , भिमराव चंद्रवंशी , शंकर कदम , आशा देवसरकर , सचिन घाडगे , गजानन कदम , अॅड बळीराम मुटकुळे , अॅड युवराज देवसरकर,
सरोज देशमुख , सविता कदम , दत्तराव कदम , डॉ प्रमोद दुथडे , बंडु पाटिल ( कदम ) , चक्रधर देवसरकर, प्रविण सुर्यवंशी, प्र भा काळे , अरविंद धबडगे , बालाजी देशमुख , संदीप घाडगे , राजेश वानखेडे यांच्या सह सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते .
