Budget 2018 - मोदी सरकारने काय दिले देशवासींयांना? अर्थसंकल्प 2019 च्या निवडणुका जिंकून देणार का

 

नवी दिल्ली :- केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. पुढील वर्षी लोकसभा निवडणुका असल्याने मोदी सरकारचा हा अखेरचा पूर्ण अर्थसंकल्प आहे. या मुळे संपूर्ण देशाचे लक्ष या बजेटकडे लागले होते.  
- सर्व सरकारी दाखले ऑनलाइन मिळणार
- म्युच्युअल फंडातून मिळालेल्या उत्पन्नावर 10 टक्के कर
- उद्योग क्षेत्राला मोठा दिलासा. 250 कोटींपर्यंत टर्नओव्हर असणाऱ्या कंपन्यांना लागणार 25 टक्के कॉर्पोरेट टॅक्स
- नोकरदारांना 40 हजारांचा स्टॅडंर्ड डिडक्शन. उत्पन्नापेक्षा कमी 40 हजार कमी रकमेवर कर
- ज्येष्ठ नागरिकांना 50 हजार रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज, अगोदर 10 हजारांची मर्यादा होती
- शेअर बाजरातील शेअर्सच्या विक्री व्यवहारावर कर भरावा लागणार
- आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातील सेसमध्ये एका टक्क्याची वाढ;  सेस 3 वरुन 4 टक्क्यांवर
- कच्च्या काजूवरील कस्टम डयुटी 5 वरुन अडीचवर
- निर्गुंतवणुकीतून 80 हजार कोटी रुपये मिळवण्याचे लक्ष्य
- 1 लाख ग्राम पंचायती ऑप्टीक फायबरने जोडण्याचे काम पूर्ण झाले आहे, ग्रामीण भागात 5 लाख वायफाय स्पॉट बनवण्यात आले आहेत
- तीन सरकारी विमा कंपन्यांचे विलिनीकरण करुन एकच कंपनी बनवणार
- क्रिप्टोकरन्सी काळा पैसा साठवण्यासाठी वापरली जाते, अशा चलन व्यापारावर निर्बंध आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील
- क्रिप्टोकरन्सीला सरकार कायदेशीर समजत नाही
- रोखीने टोल देण्याची सिस्टम डिजिटल करणार
- टीव्ही, मोबाइल महागणार, सीमा शुल्कात वाढ; परिणामी मोबाईल फोन महागण्याची शक्यता
- वित्तिय तूट 3.3 टक्क्यांवर आणण्याचे लक्ष्य
- राष्ट्रपतींचा पगार 5 लाख, उपराष्ट्रपतींचा पगार 4 लाख तर राज्यपालांचा पगार 3 लाख रूपये.
- खासदारांचा पगारही एप्रिल 2018मध्ये वाढणार
- दर पाच वर्षांनी महागाई दराप्रमाणे पगार वाढणार
- 2014-15 मधील करदात्यांचा आकडा 6.47 वरुन 8.27 कोटींवर पोहोचला आहे
- काळ्यापैशाविरूद्ध सुरू केलेल्या लढाईचा परिणाम; आयकर भरणाऱ्यांच्या संख्येत वाढ
- 2018-19 या आर्थिक वर्षात वित्तीय तूट 3.3 टक्के ठेवण्याचे लक्ष्य.
- आयकरात तब्बल 90 हजार कोटींची वाढ झाली
- कृषी उत्पादक कंपन्या पहिल्या पाच वर्षांसाठी 100 टक्के करमुक्त
- यावर्षी 8.27 कोटी लोकांनी कर भरला. गेल्या वर्षीच्या तुलनेत 19 लाख लोकांची वाढ
- 2016-17 या आर्थिक वर्षात 8.27 कोटी नवीन करदातो वाढले
- इन्कम टॅक्स रचनेत कोणताही बदल नाही, अडीच लाख रुपये उत्पन्न करमुक्तच राहणार
- वापरात नसणारी 56 एअरपोर्ट व 31 हेलिपॅड्स उडान योजनेशी जोडणार
- प्रवाशांची सुरक्षा, रेल्वेरूळाची योग्यवेळी डागडुजी, तंत्रज्ञानाचा योग्य वापर व धुक्यापासून संरक्षण करणारी यंत्रणा उभारणं लक्ष्य
- विमानतळांची संख्या 5 टक्क्यांनी वाढणार
- देशभरात 600 रेल्वे स्थानकांचं आधुनिकीकरण
- मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी वडोदरा येथे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्याचे काम सुरू
- सर्व रेल्वे स्थानके, रेल्वेगाड्यांमध्ये वाय-फाय, सीसीटीव्ही कॅमेरे
- रेल्वे स्थानकांवर एक्सलेटर बसवण्यात येणार, सर्व रेल्वे स्थानक आणि ट्रेनमध्ये वायफाय आणि सीसीटीव्ही बसवण्यात येणार
- देशभरात 600 नव्या रेल्वे स्थानकांचं आधुनिकीकरण. रेल्वेरूळ दुरूस्तीचं काम
- 11 हजार कोटी रूपये खर्चून मुंबईत 90 किमीच्या रेल्वे ट्रॅकच्या दुहेरीकरणाचं काम सुरू
- 'राष्ट्रीय रेल्वे संरक्षण कोष' या योजनेंतर्गत प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी नवी योजना लागू करणार
- 18 हजार किलोमीटरच्या रेल्वेमार्गाचं दुहेरीकरण आणि 3600 किमीचे ट्रॅक नव्याने बांधण्याचं काम हाती
- वडोदरा येथे प्रस्तावित रेल्वे विद्यापीठातील तज्ज्ञ बुलेट ट्रेनच्या कामासाठी मार्गदर्शन करणार
- रेल्वे सेवेच्या विकासासाठी वर्षात 1 लाख 48 हजार कोटींचा निधी खर्च करणार
- 600 रेल्वेस्थानकांचा विकास सुरु. विविध सोयी-सुविधा उपलब्ध होणार
- 9 हजार किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग बांधण्याचं सरकारचं लक्ष्य- अरुण जेटली
- 11 हजार कोटी रूपये खर्चून मुंबईत 90 किमीच्या रेल्वे ट्रॅकच्या दुहेरीकरणाचं काम सुरू
- रेल्वे जाळे मजबूत करणे आणि प्रवासी क्षमता वाढवण्याला सरकारचे प्राधान्य
- 4 हजार किलोमीटर रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाची कामे पूर्ण करणार
- रेल्वेच्या विकासासाठी वर्षभरात 1 लाख 48 हजार कोटी रुपये खर्च करणार 
- स्वच्छ पाणी योजनेसाठी 2600 कोटी रुपयांची तरतूद
- येत्या वर्षभरात 70 लाख नवीन नोकऱ्यांची निर्मिती करण्याचे सरकारचे लक्ष्य
- 50 लाख तरुणांना नोकरीसाठी आवश्यक प्रशिक्षण देणार
- मुद्रा योजनेमुळं 10.38 कोटी नागरिकांना होणार फायदा
- नोटाबंदीनंतर नुकसान भरून काढण्यासाठी लघुउद्योगांसाठी 3700 कोटी रुपयांची तरतूद
- नवीन कर्मचाऱ्यांच्या ईपीएफमध्ये सरकार 12 टक्के रक्कम देणार
 - मुद्रा योजनेंतर्गत 2018-19 या कालावधीत 3 लाख कोटींचे कर्ज वितरित करण्याचं लक्ष्य
- गंगा स्वच्छतेसाठी 187 योजनांना मंजुरी
- देशभरात 24 वैद्यकीय महाविद्यालये उभारणार
- टीबी रोखण्यासाठ 600 कोटी रुपयांची तरतूद
- आरोग्य सुविधांसाठी 'आयुषमान भारत' योजनेची घोषणा; 50 कोटी नागरिकांना लाभ होणार
- शैक्षणिक क्षेत्रासाठी 1 लाख कोटींचा निधी खर्च करणार
- डिजिटल शिक्षणावर भर देणार, 13 लाख शिक्षकांना प्रशिक्षण देणार
- ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांसाठी 14.34 लाख कोटी रुपये
- आदिवासी विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण मिळावं यासाठी 'एकलव्य स्कूल' उभारणार
- नॅशनल हेल्थ पॉलिसी अंतर्गत येणारी 1.5 लाख सेंटर्स लोकांच्या घराजवळ पोहोचवण्याचा प्रयत्न, हे सेंटर्स मोफत तपासणी आणि औषधं देणार यासाठी 12 हजार कोटींची तरतूद
- प्रधानमंत्री सौभाग्य योजनेतून 4 कोटी घरांना मोफत वीजजोडणी देणार
- 8 कोटी महिलांना उज्ज्वला गॅस कनेक्शन देणार
- बचत गटांना 42 हजार कोटींवरून 75 हजार कोटी कर्ज देण्याचा सरकारचा निर्णय
- स्वच्छ भारत मोहिमेंतर्गत 6 कोटी शौचालय बांधणार
- येत्या दोन वर्षांत देशभरात २ कोटी शौचालय उभारणार
- शेती कर्जासाठी 11 लाख कोटींचा निधी राखीव
- ऑपरेशन ग्रीनसाठी 500 कोटींची तरतूद
- 10 कोटी गरिबांसाठी नॅशनल हेल्थ प्रोटेक्शन योजना, या योजोने अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला वर्षाला पाच लाखांची मदत
- नाबार्डच्या माध्यमातून सुरु असलेल्या सूक्ष्म सिंचन योजनेत वाढ करण्याचा निर्णय घेतला
- मत्स्य शेती आणि पशूसंवर्धन विकासासाठी 10 हजार कोटींची तरतूद
- अन्न प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी 1400 कोटी रुपयांची तरतूद
- 100 बिलियन डॉलरचा शेतमाल सध्या निर्यात केला जातो. त्यासाठी 42 फूडपार्क उभारणार
- बांबू शेतीसाठी 1290 कोटी रुपयांची योजना
- अन्न प्रक्रिया उद्योगासाठी सरकार 1400 कोटींची तरतूद करणार
-585 शेती मार्केटच्या पायाभूत सुविधांसाठी 2 हजार कोटींची तरतूद
-  अन्न प्रक्रिया उद्योगात वर्षाला 8 टक्क्यांनी वाढ होत आहे
- 585 शेती मार्केटच्या सुधारणांसाठी 2 हजार कोटींची तरतूद
- 470 एपीएमसी बाजारपेठा इंटरनेटने जोडण्यात आल्या आहेत
-शेतक-यांना दीडपड जास्त मोबदला देण्यात येणार; अरुण जेटलींनची घोषणा
- देशातील कृषी उत्पादन विक्रमी स्तरावर पोहोचले आहे
- यावर्षीचा अर्थसंकल्प शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला समर्पित
- शेतकरी कल्याणासाठी आमचे सरकार कटिबद्ध, 2020मध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं मोदी सरकारचं ध्येय
- भारताचे रँकाींग सुधारले
- देशात भ्रष्टाचार हाच शिष्टाचार झाला होता आमच्या सरकराने हे चित्र बदलले
- सरकारने सूत्रं हाती घेतल्यापासून देशाच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा होत आहे.
- केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या संसदेतील भाषणाला सुरुवात
- अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी सेन्सेक्स तेजीत; 200 अंकांनी घेतली उसळी
- सर्वसामान्यांचं स्वप्न पूर्ण करणारा अर्थसंकल्प: पंतप्रधान नरेंद्र मोदी
- अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी सेन्सेक्स पोहचला 36100 अंकांवर, निफ्टीही 11000 हजार पार
- पहिल्यांदाच हिंदीतून सादर होणार अर्थसंकल्प
- अर्थमंत्री अरुण जेटली संसदेत दाखल
- अर्थसंकल्पासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज, राम विलास पासवान संसदेत दाखल

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post