बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी कौशल्य विकास,



नीलेश सूखसोहळे
  अकोला, दि. 28 - बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजगता विभागाच्या वतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन आज दि.29 जानेवारी 2018 रोजी राधादेवी गोयनका महिला महाविदयालय येथे करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी भारतीय सेवा सदनचे अध्यक्ष दिलीपराज गोयनका, राधादेवी गोयनका महिला महाविदयालयाचे प्राचार्य देवेंद्र व्यास, खंडेलवाल ज्वेलर्सचे नितीन खंडलेवाल, पॅडसन्स इंडस्ट्रीजच्या अपुर्वा पडगीलवार, आर के टेक्नॉलाजीचे रेखा अरंविद देठे, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजगता विभागाचे सहाय्यक संचालक दत्ता ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. देशातील एकूण लोकसंख्येच्या 60 टक्के लोकसंख्या ही चाळीशीच्या आत आहे. तसेच देशाची 50 टक्के लोकसंख्या महिलांची आहे. स्त्री शक्तीला योग्य व्यासपिठ मिळाले तर देशाच्या विकासासाठी हि स्त्रीशक्ती कामी येवू शकते हा विचार करून देशाच्या बांधणीसाठी काम करीत असतांना स्त्रीयांनी शिक्षणासोबत कौशल्य निर्माण करावे, असे आवाहन पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी केले.

प्रशिक्षण घेतांना प्रशिक्षणाचा सर्व खर्च शासन करणार आहे. याचा लाभ युवतींनी घ्यावा असेही ते म्हणाले. मोबाईलचा वापर कमी करावा हे पथ्य पाळावे असे ते म्हणाले.
रोजगार मेळाव्यांमध्ये उद्योजक व नोकरी उत्सुक उमेदवारांना एका छताखाली आणून उद्योजकांना आवश्यक मनुष्यबळ विनामुल्य उपलब्ध करुन देणे व नोकरी उत्सुक उमेदवारांना नोकरी मिळवून देण्यासाठी सहाय्य करण्यात येते. यासाठी ऑनलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध करण्यात येत असल्याची माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजगता विभागाचे सहाय्यक संचालक दत्ता ठाकरे यांनी दिली. यावेळी भारतीय सेवा सदनचे अध्यक्ष दिलीपराज गोयनका यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पॅडसन्स इंडस्ट्रीजच्या अपुर्वा पडगीलवार , आर के टेक्नॉलाजीचे रेखा अरंविद देठे, एल आय सी चे शाखा व्यवस्थापक निखील देशपांडे , निर्माण स्कॅन्सस् प्रायव्हेट लिमीटेडचे गणेश देशमुख , ओझोनचे दिपक दानडे , आश्लेषा पावरचे अखिलेश बोरा यांनी आपल्या कंपनी विषयी माहिती सांगितली.या रोजगार मेळाव्यासाठी खंडेलवाल ज्वेलर्स, अश्लेषा पॉवर कंट्रोल, निर्माण स्कॅन्स , आर के टेक्नॉलाजी , ओझोन मल्टीस्पेशालीस्ट हॉस्पीटल , एल आय सी अशा एकूण 6 स्थानिक व धूत ट्रान्समिशन औरंगाबाद व रुबीकॉन फॉम्युलेशन औरंगाबाद अशा 2 बाहेरच्या अशा एकूण 8 कंपन्या आल्या होत्या. या कंपन्याच्या माध्यमातून 306 युवतींना रोजगार मिळणार आहे. या मेळाव्याचा 500 हून अधिक युवतीनी लाभ घेतला. या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी आर डी जी महाविदयालयाच्या डॉ. उषा वानखडे व जिल्हा कौशल्य विकास , रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केद्रांचे अजय चव्हाण सह अधिकारी व कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post